आता ह्यात मुद्दाम पाककृती लिहिण्यासारखं काही नाहीये, तरीही माझ्यासारख्या सगळे पदार्थ विसरून आणि पुन्हा वाचून करणाऱ्यांसाठी लिहून ठेवतेय. कदाचित तुम्ही नेहमी करता त्यापेक्षा वेगळी चव मिळून जाईल.
ऋग्वेदाचा निश्चित काळ ठरवण्याबाबत संशोधकांचे एकमत नसले तरी ऋग्वेदातील मंडलांच्या कालनुक्रमाबाबत तज्ञांमध्ये एकवाक्यता आढळते. आपण मागील भागात पाहिले की ऋग्वेदाच्या शाकल शाखेत एकुण दहा मंडले आहेत. भाषाशास्त्रज्ञांना असे आढळून आले की, ह्या दहा मंडलांची तुलना केली असता त्यातील भाषेत कालौघात झालेले बदल दिसून येतात. भाषाशास्त्र(Linguistics) आणि शैलीशास्त्र (Stylometric) ह्या दोघांच्या आधारे संशोधकांनी ऋग्वेदातील मंडलांचा खालील कालानुक्रम (Chronology) लावला आहे.
ऋग्वेद म्हणजे जगातील आजच्या घडीला उपलब्ध असणारे सर्वात प्राचीन पुस्तक. ‘काय आहे ह्या पुस्तकात?’ असा प्रश्न पडला असेल तर त्याचे उत्तर आहे कविता! अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर ऋग्वेद म्हणजे अनेक कविता संग्रहांचे संकलन आहे. वेगवेगळ्या कविंनी वेगवेगळ्या वेळी केलेल्या कविता असलेल्या पुस्तकांचा एकत्रित संच! ह्यातील प्रत्येक पुस्तकाला मंडल अशी संज्ञा आहे. आता हे संकलित वाङमय आहे म्हणजे त्याचे संपादन करणारी कुणितरी व्यक्ती असणार हे ओघाने आलेच. तर असे कितीतरी संपादक होऊन गेले ज्यांनी आपापल्या मतानुसार कविता आणि त्या पठण करण्याच्या पद्धतीनुसार ऋग्वेदाचे संपादन केले.
“परत हिचं काय अजून नवीन???”
हा प्रश्न पाडून धागा उघडलात का???
बरेच दिवसापासून रादर वर्षांपासून मनात हे सुरू करायचं होतं. पण या ना त्या कारणाने राहून जात होतं. भीती ही होतीच. इनव्हेस्टमेंट ची !
पण मारलीच एकदाची उडी.
सोन्याचे भाव कुठवर गेलेत यावर मी बोलूच नये खरं तर. सगळेच धस्तावलेले आहेत. काही महिन्यांपूर्वी काही हजारात मिळणारी वस्तू आता लाखात मिळू लागली आहे.
वैदिक किंवा सनातन वाङमय म्हणजे केवळ धार्मिक ग्रंथ नसून संपूर्ण संस्कृतीचा 'Encyclopedia' आहेत. ज्यात भाषेपासून (व्याकरण) ते अंतराळापर्यंत (ज्योतिष) आणि आरोग्यापासून (आयुर्वेद) ते मनाच्या गाभ्यापर्यंत (उपनिषदे/दर्शने) सर्व विषयांचा ऊहापोह आहे. ढोबळ मानाने वैदिक वाङमयाचे दोन गटात वर्गीकरण करता येईल:
श्रुती साहित्य: ह्यात ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद ह्या चार वेदांचा समावेश होतो.
स्मृती आणि इतर पुरक साहित्य: ह्यातील मुख्य घटक खालीलप्रमाणे
सत्याचा शोध हा मनुष्याच्या डोक्याला लागलेला कायमचा भुंगा आहे. सापडलेलं फळ खाण्याजोगं आहे की नाही, पाऊस पडेल की ऊन अश्या प्रश्नांपासून कदाचित सुरुवात झाली असेल; पुढे समोरचा माणूस मित्र असेल का शत्रू, दिवस रात्र का होतात, प्रत्येक जिवाच्या जगण्याचं काय प्रयोजन इथपर्यंत. माणसाला प्रश्नच प्रश्न पडत गेले. एक उत्तर मिळून ही प्रश्नशृंखला थांबत नाही ते एक, दुसरं म्हणजे मिळालेली उत्तरंही वेळोवेळी तपासून बघावी लागतात. कधी कधी जुने सिद्धांत पुढे चुकीचे ठरतात, नवे पुरावे हाती लागतात. याला आपण साधारणपणे प्रगती असं म्हणतो.
स्पॉयलर अलर्ट - पुढील लेखात बिभत्स रस आहे. तो अगतिकते पोटी आलेला आहे. कोवळ्या मनाच्या वाचकांनी खरंच वाचू नये. चुकून माकून कुठेतरी "करुण" रस जाणवला, तर तोच योगायोग समजावा.
लंडनला पहिल्यांदा आले तेव्हा हातात नोकरीचे पत्र आणि चार दिवस राहायची एका बेड आणि ब्रेकफास्टच्या ठिकाणी सोय एवढेच होते. ना कोणी ओळखीचे आणि जे कोणी ओळखीच्यांच्या ओळखीचे त्यांचीही फार काही मदत करायची तयारी नव्हती. त्यामुळे तिथे पोहोचल्यावर बघुयात असा विचार म्हणण्यापेक्षा दुसरा पर्यायच नव्हता. नावाला शासकीय नोकरी, पण तोपर्यत सरकारी कर्मचारी या प्राण्याबद्दल भारतात जे काही माहित होते, ते काहीच या देशात लागू पडत नाही, हे कळू लागले होते. सुरुवातीचे काही दिवस, आठवडे इकडे तिकडे काढल्यावर एक आत्येभाऊ इथे असल्याचा शोध लागला.
घरावर वस्तीला यायचे तर आधी वहिवाटीची सोय बघायला हवी . वसंत ग्रीष्माच्या सीमारेषेवर इथे आले त्यामुळे सगळीकडे फुलापानांचा बहर होता . दिवस बऱ्यापैकी मोठा त्यामुळे उशिरापर्यंत उजेड असायचा . बाहेर लोक दिसायचे , बऱ्यापैकी चाहूल होती आणि पहिले काही दिवस सामान टाकून ऑफिसच्या वाऱ्यांसाठी मी बाहेरच होते. एक दिवस मध्यरात्री नंतर पोहोचले , असंही सगळं सामसूम असतंय , त्यादिवशी गडद अंधार , गाडी ते घराचे दार ५-७ मिनिटं लागतात, त्यात चढ, मग लागणारा दरवाजा आणि मग घराचं दार, काहीच दिसत नव्हते. सोलर लाईटस मिणमिणते प्रकाशायला पण सूर्यप्रकाश मिळत नव्हता. वाट आणि प्रकाशाची सोया करणं क्रमप्राप्त होतं.
Rahi Anil Barve यांनी AI tools वापरून (low budget experiment म्हणून) बनवलेला हा सिनेमा, एका पुरातत्त्व अधिकाऱ्याच्या म्हणजेच सदाशिवच्या अनुभवातून “अज्ञात”, “मन” आणि “भीती” यांचा शोध घेतो.
सदाशिव एका दुर्गम गावात हडमगाव येथे येतो. गावाबाहेर पावसाने उघड झालेला एक गूढ घुमट/मंदिर, आणि त्याभोवती फिरणारे विचित्र, अबोल गावकरी हे सगळं वातावरण स्वतःच एक पात्र बनून उभं राहतं.
मार्टिन , मॉली आणि मिंटी M x३ - मार्टिन बाप, मॉली, मिंटी जुळे भाऊ बहीण, त्यांची आई एक दीड वर्षाआधी गेली. घर बघायला आले तेव्हाच ऍडमनी विचारले होते, 'तुला मेंढ्या हव्यात का?' हजारो ख्वाहिशें मध्ये मेंढ्या कधीच नव्हत्या त्यामुळे मी बावचळून बघितले त्याच्याकडे.
'...तीन एकरची जागा साफ कशी ठेवशील - मेंढ्या असतील तर गवत फार वाढणार नाही ...'
'पण त्यांच्या निगेचं काय?'
10-15 मार्च
सध्या रमादानचे सरते दिवस आहेत. हे दिवस या लोकांसाठी सगळ्यात जास्त प्रार्थना करण्याचे असतात. त्यामुळे बहुधा दिवसा होणारे स्फोट सध्या खूप कमी झाले आहेत. रात्री मात्र boys पाणी पिऊन, खाऊन येतात. रात्रीची प्रार्थना झाली की सुरू होतात. मला लहानपणी आम्हा भावंडांना पिशवीत आपापल्या वाटणीचे फटाके मिळायचे दिवाळीत तसेच या लोकांना कोणीतरी वाटून देते missiles drones असे वाटत असते !!
युध्दाचीडायरी दिवस कुठलातरी
त्या संध्याकाळी आपण वर्ल्ड कप जिंकलो होतो. Men in Blue आमच्यासाठी बंकर मध्ये आनंद घेऊन आले. खुशीतच झोपायला गेलो. शांत होते जरा म्हणुन रूमवर गेलो झोपायला. याला सकाळी पाचला मॉर्निंग शिफ्ट ला जायचे होते. रात्री दोन च्या आसपास जाग आली प्रचंड मोठ्या स्फोटांच्या आवाजाने. भोंगा वाजू लागला. इन्स्टावर अधिकृत चॅनेल वर कुठे काय झाले कोणीतरी टाकतेच. त्यात समजले आमच्या कंपनी जवळ ड्रोन लोकवस्तीच्या मध्ये पडले आहे. लोक दगावले आहेत. मोठी आग लागली होती. एक तर छोटेसे दोन महिन्याचे बाळ....
चक्रावला असशील ना हे पत्र पाहून ?
ठाऊक आहे मला. म्हटला असशील, आता हिचे आणखी काय नवीन ? आयत्या वेळी कशा बरे नेमक्या काहीतरी शंका? वगैरे वगैरे..
नाही, शंका वगैरे नाही. आपण उद्यापासून एकत्र रहायला सुरुवात करणार, त्याधी मला हे तुला लिहून द्यायचे होते. बोलूही शकले असते पण हे मला कागदावर उतरवायचे होते. आपण काही लग्न करत नाही आहोत. ना सप्तपदी, ना टोस्ट (आजकालच्या लग्नात करतात तसे). तसे आपल्या बाबतीत काहीच कन्वेन्शनल नाही ना? तसेच हे पत्रही समज. आपल्या एकत्र राहण्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर मला हे अपडेट करत राहायचे आहे..म्हणूनच हा पत्राचा उद्योग.
राणीमाशीनंतर आपण आता कामकरी माशीबद्दल माहिती घेऊ. (Worker Bee).
पोळ्यात सगळे काम कामकरी माश्या करतात हे ऐकुन होते. पण नेमके काय काम करतात आणि त्यांचा जीवनक्रम कसा असतो हे कळल्यावर माझा जबडा द मास्कमधल्या जिम कॅरेसारखा जमिनीवर पडुन गडाबडा लोळायला लागला. :)
मुळात मधमाशी हे प्रकरणच थक्क करणारे आहे आणि त्यातल्या कामकरी माश्या तर एकदम जबडापाडू आहेत.
आपण या प्रचंड कामसु माशीचा जन्म कसा होतो ते आधी पाहुया.
माझ्या मराठी मातीचा
लावा ललाटास टिळा
हिच्या संगाने जागल्या
दऱ्या खोऱ्यातील शिळा
मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा ! /\
माझे आजोबा मला म्हणायचे "वाणी प्रसन्न आहे तुझ्यावर, सुपारी खात जाऊ नकोस. शारदेला रुष्ट करू नकोस." वाणी म्हणजे नेमकं काय हे आताही कळालेलं आहे की नाही माहीत नाही. वाणी म्हणजे आपल्या मुखातून (किंवा लेखनातून) बाहेर येणाऱ्या शब्दांतील ऊर्जा असावी... कदाचित.
मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा....
कोणाला?
ज्यांना ल आणि ळ यातला फरक कळतो आणि ते स्वच्छ स्पष्ट म्हणता येतात त्यांना,
ज्यांना नळ आणि बाण म्हणणं बरोबर आहे हे पटतं त्यांना,
ज्यांना पहिली वेलांटी आणि दुसरी वेलांटी चुकीची दिली कि डोळ्यात खुपते त्यांना,
ज्यांना श च्या जागी ष आणि ष च्या श लिहिलेला बरोबर करावा वाटतो त्यांना
आणि
ज्यांना "चा टाक" म्हणणं तितकंच बरोबर वाटतं जितकं "चहा ठेवतेस का" त्यांना,
ज्यांचं "बारं मग ठिऊ का" कानांना गोड वाटतं त्यांना,
ज्यांची "काय पावनं कुणीकडंनं आलायसा" अशी मनापासून आपुलकी असते त्यांना,
आज फ्रीजमध्ये अगदी पाव वाटी खवलेला नारळ उरला होता, त्याला मार्ग दाखवायचा म्हणून रिल्समध्ये दिसलेली वाटपाची डाळ आठवली. आमच्याकडे अशी डाळ कधीच करत नाहीत म्हणून वाईच insta खंगाळलां!
साहित्य:
कुकर साहित्य:
तूरडाळ: १ वाटी
मध्यम कांदा: अर्धा चिरून
मध्यम टोमॅटो: १ चिरून (कैरीच्या सीझनमध्ये टोमॅटो अर्धा आणि दोन तुकडे कैरी)
दोन हिरव्या मिरच्या: उभ्या चिरून (तिखट प्रेमींनी जास्त म्हणजे तीन चार घ्या)
अर्धा चमचा हळद
थोडे मीठ
मधमाशीची शरीररचना आपण समजुन घेतली. आता मधमाशीच्या जीवनक्रमाची माहिती घेऊया.
राणी, कामकरी व नर अशा तिन जातीच्या माशा पोळ्यात असतात. प्रत्येक पोळ्याची राणी एकच असते, नर दोन तिनशे असतात आणि कामकर्या हजारो असतात. एका निरोगी पोळ्यात साधारण विस हजार ते ऐंशी हजार मधमाशा असतात. बाहेर फुलोरा असतो म्हणजे मुबलक अन्न असते तेव्हा पोळ्यात मधमाश्या भरपुर असतात, बाहेर हिंवाळा किंवा पावसाळा असतो म्हणजे अन्न उपलब्ध नसते तेव्हा मधमाशांची संख्या रोडावते. पोळ्यात साठलेल्या मधावर गुजराण करायची तर जास्त लोकसंख्या असुन चालत नाही.
मधमाशीच्या घराची ओळख झाल्यावर आपण आता मधमाशीची ओळख करुन घेऊ. ही माहिती सर्व माश्यांना सारखीच लागू पडत असली तरी माश्यांचे आकार त्यांच्या प्रजातीनुसार लहान मोठे असतात. मधमाशीवरचे बहुतांश संशोधन अॅपिस मेलिफेरावर झालेले आहे. ही युरोपियन माशी आहे पण भारतातही आढळते. आपली भारतीय माशी अॅपिस सेरेना जिला महाराष्ट्रात सातेरी म्हटले जाते. ही मेलीफेरापेक्षा लहान आहे आणि तिच्यावर फारसे संशोधन अद्याप झालेले नाही. मधमाश्यांच्या प्रजातीबद्दल जास्तीची माहिती आपण नंतरच्या भागात घेऊया.
मधमाशी हा किटक अखिल मानवजातीला लाभकारी आहे असे गेले कित्येक वर्षे ऐकत आहे. मधमाशी संपली तर चार वर्षात मानवही पृथ्वीवरुन संपेल असे एक वाक्य अल्बर्ट आईनस्टाईनच्या नावावर खपवले जाते. मला शेतीत रस असल्याने मधमाशीबद्दल आकर्षण होते पण ते सोडता बाकी काही माहिती नव्हती.
तर, सोमवारची संध्याकाळ. दिवसभराच्या ऑफिसच्या कामाचा, ताणाचा क्षीण अंगात पसरलेला. काहीशा विष्ण्ण मनस्थितीतच टीव्ही चालु केला. घरात अंधार, मनात अंधार, विविध कारणांमुळे. प्राइमवर मनोज वाजपेयी दिसला. टायटल न वाचता, चित्रपट आहे का सिरीज आहे काही न बघता चालु केला. मनोज वाजपेयी असेल ते सर्व काही बिनधोक बघावे हा नेहमीचाच विचार.
फिरत्या चाकांवर आपण एका ठिकाणाहून दुसरीकडे जातो त्याला आपण जनरली प्रवास म्हणतो. पण त्या व्यतिरिक्त हि आपल्या आयुष्यात काही प्रवास नकळतपणे घडत असतात.
आपल्या विचारांची बैठक अनुभवांनी बदलते. शरीरयष्टी बदलते. आपण कसे दिसावे या बद्दलचा प्रवास पण हळू हळू बदलत जातो.
काळ्याकडून पांढऱ्याकडे (केस) - हा एक खूप मोठा प्रवास आहे असं मला वाटतं. भल्या भल्यांना तो शिफ्ट मारताना त्यांची स्थिती दोलायमान होते.
साध्या शब्दांत सांगायचं तर, मशीनच्या बाबतीत मेंटेनन्स मोड म्हणजे नवीन काही तयार करणं, वेगाने धावणं, सतत सिद्ध करत राहणं थांबवणं.
नवीन अपडेट्स थांबवणं. फक्त आवश्यक तितकंच काम करणं. काही बिघाड झाला असेल तर तो तपासणं. जुन्या फाईल्स मेमरीतून काढून टाकणं आणि स्वतःला स्थिर कसं ठेवायचं हे पावलोपावली ठरवणं.
माणसाच्या आयुष्यातसुद्धा असा एक मेंटेनन्स मोड येणं गरजेचं असतं ....... आणि तो येतोच.