मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा....
कोणाला?
ज्यांना ल आणि ळ यातला फरक कळतो आणि ते स्वच्छ स्पष्ट म्हणता येतात त्यांना,
ज्यांना नळ आणि बाण म्हणणं बरोबर आहे हे पटतं त्यांना,
ज्यांना पहिली वेलांटी आणि दुसरी वेलांटी चुकीची दिली कि डोळ्यात खुपते त्यांना,
ज्यांना श च्या जागी ष आणि ष च्या श लिहिलेला बरोबर करावा वाटतो त्यांना
आणि
ज्यांना "चा टाक" म्हणणं तितकंच बरोबर वाटतं जितकं "चहा ठेवतेस का" त्यांना,
ज्यांचं "बारं मग ठिऊ का" कानांना गोड वाटतं त्यांना,
ज्यांची "काय पावनं कुणीकडंनं आलायसा" अशी मनापासून आपुलकी असते त्यांना,