१९६५ मध्ये सलग दोन वर्षे देशात पडलेल्या भयंकर दुष्काळाने भारतातील जनतेवर उपासमारीची वेळ आणली. अन्नधान्य आयात करुन लोकांचा जीव जगवणे सरकारला भाग पडले.
परत अशी वेळ देशावर येऊ नये म्हणुन हरित क्रांती जन्माला आली. त्याखाली जास्त उत्पन्न देणारी संकरीत बियाणे भारतात झपाट्याने विकसित झाली व प्रसारीत झाली. त्याआधीची प्रचलीत पारंपारिक बियाणे मर्यादित उत्पन्न देत होती.
सत्यमेव जयते ही सिरिज साधारण २०१२ मध्ये प्रसारीत व्हायला सुरवात झाली. त्यात काही भाग शेतीसंबंधी होते. त्यात एक होता महाराष्ट्राच्या काही दुष्काळग्रस्त जिल्ह्यातली पाणीटंचाई आणि एक होता पिकांवरील किटकनाशकांमुळे शेतकर्यांमध्ये वाढलेले कर्करोगाचे प्रमाण.
कार्यक्रमाचा निर्माता आमिर खान याची या निमित्ताने शेतीविषयक प्रश्नांशी ओळख झाली.