घरची, दारची, सासरची, माहेरची सगळी माणसं, गुरं, प्राणी पक्षी सगळ्यांना सुखी ठेव रे महाराजा"..
गाऱ्हाण चाललं होतं. आणि डोळे भरून आले. घरी पालखी आली होती. ४ ५ वर्षांनंतर. इतकी वर्ष ऐकलेली आणि इतरांच्या रिल्स वर पाहिलेली पालखी आमच्या घरी आली होती. देव घरी आले होते. घाईत होते तरी थोडा वेळ थांबले. पाहुणचार करून घेतला, विसावले आणि मग पुढच्या घरी निघाले.