दार उघडून तो आत शिरला आणि मागोमाग ती आल्यावर त्याने दार लावून घेतले.
हां! रिलॅक्स होऊन तो धप्पकन बीन बॅगवर बसला. ती हळूच एकेक पाऊल टाकत त्याच्या आणि तिच्या खोलीतला कॉन्ट्रास्ट नजरेखाली घालत होती.
"हॅव अ सीट!" तो त्याच्यासमोरच्या बीन बॅगकडे हात दाखवून म्हणाला. ती शांतपणे तिथे जाऊन बसली. "सो.. अप्पांबद्दल माझा अंदाज बरोबर होता. आपण ठरवलं तसं पुढे जायचं की तुला ते कठीण वाटतंय?" त्याने आपल्या मनातली खळबळ लपवून विचारलं.
अचानक वाजलेल्या मोबाईलच्या रिंगने नोरा विचारचक्रातून खडबडून बाहेर आली. पोटाशी धरून ठेवलेली उशी बाजूला ठेऊन तिने फोन उचलला. अनोळखी नंबर बघून कपाळावर आठ्या आल्या तरी तिने तो उचलला.
"हॅलो नोरा.." त्याचा काही तासापूर्वीचा कॉन्फिडन्ट आवाज आणि आताचा तिचा अंदाज घेणारा शांत आवाज तिला समजला.
"हाय. पलाश?" तिने विचारले.
"हम्म. मी कॉल का केला त्याचं कारण एव्हाना तुला कळलंच असेल." तो म्हणाला.
"हो. घरात राडो सुरू आसा. तुका माजो नंबर खंय मेळलो ?" नोराला आता त्याचाही राग येऊ लागला.
दाराबाहेरून येणाऱ्या माया आणि ममाच्या मोठ्या आवाजाने तिला जाग आली. लगेचच तो नोराss नोराss म्हणून जोरात हाका मारत तिचा दरवाजा ठोकू लागला. "अरे एवढ्यात लंच टाईम झाला पण!" म्हणत ती आळस देत उठली.
पलाश त्याची कामे करताना मधून मधून गर्दीत नोराला शोधत होता. अचानक ती दिसेनाशी झाली होती. पायल तर आधीच तिच्या वडिलांबरोबर निघून गेली होती. मिनूने त्याला गाठून नोराची चौकशी केल्यावर तो अगदीच गोंधळून गेला. मिनूलाही न सांगता ही गेली कुठे... त्याने बेकरीच्या मोबाईलवर कॉल केला. मारिया आंटीने फोन उचलला.
"मिया तुकाच फोन करत होता, माया येत होता पन पुलावरना पानी गेला. त्याला फोनपण लागत नाही. पाऊस थांबला की नोराला सकाळी धाडून देशील काय?" त्या म्हणाल्या.
केक खाऊन सगळे आपापल्या टेबलवर सेटल होताच डीजेने डान्सची घोषणा केली. सगळे दिवे बंद झाली आणि झगझगीत फोकस मिनूचा हात हातात घेऊन डान्स फ्लोरवर जाणाऱ्या वरूणवर पडला. आय फाउंड अ लव्ह.. फॉर मी.. म्हणत एड शीरानचा आवाज सगळीकडे पसरला. त्या तालावर मिनू वरूणचा स्लो वॉल्ट्झ सुरू झाला आणि रात्र रोमँटिक झाली. एकेका ओळीवर हौशी लोकांनी कोरस सुरू केला. चार कडवी झाल्यावर गिरकी घेऊन मिनू थांबली आणि तिने बाकी कपल्सना जॉईन होण्याची रिक्वेस्ट केली. त्यांच्या नातेवाईकांपैकी तीन चार जोड्या जॉईन झाल्या आणि गाणं पुन्हा सुरू झालं.
शरदपौर्णिमेच्या दुसऱ्याच दिवशी नारायणी परत जाणार आहे हे सख्यांना कळाल्यावर त्यांनी शरदपौर्णिमा नित्यापेक्षा अधिकच उत्साहाने साजरी करायचे ठरवले. त्यासाठी सर्वच सख्या स्वतःकडील सर्वात सुंदर वस्त्र व अलंकार नारायणीने परिधान करावा असा आग्रह देखील करू लागल्या. त्यांचे ते निष्पाप, निर्व्याज प्रेम पाहून नारायणीला गहिवरून आले. तिच्याकडे असलेल्या वस्त्रालंकारात ती संतुष्ट आहे हे त्यांना पटवून द्यायला तिला बरेच प्रयास करावे लागले.
सर्व सख्या त्यांच्या भोजनसामग्रीचे वाडगे व स्वच्छ वस्त्राच्या गाठोडीत बांधलेल्या दशम्या घेऊन निर्धारित समयावर एकत्र निघाल्या.
मुग्ध व मधुर हितगूज करत त्यांची नाजूक पावलं यमुनेच्या काठाकाठानी पडत होती. प्रत्येकीने चौघींना पुरेल इतकी शिदोरी घेतली होती. उत्साहाने जरा जास्तच घेतल्या गेले हे त्यांना बोलताना लक्षात आले. कुणी बालगोपाल दिसले तर त्यांच्यासह हा खाऊ वाटावा असे त्यांच्या मनात आले.
त्या विचारांनी तिच्या हस्तांनाही वेग दिला. सकाळची कामं भराभर आटोपली पण मध्यान्ह काही होईना ! मगं गुणवंती मावशीला अजून कार्य सांगण्यासाठी टुमणे लावले, व लोणी काढायचे काम कमळेकडून आग्रहाने स्वतःकडे घेतले. मावशीला ही चलबिचल लक्षात येऊन त्या म्हणाल्याही "अगं तुझी आजची कार्यसंपन्न करण्याची गती बघता तू तर पहाता पहाता भांडभर नवनीत काढशील किंवा तेच भयाने तरंगायला लागेल क्षणभरात !"
मुखबंधन : ही एक काल्पनिक कथा आहे. राधाकृष्ण यांच्या कित्येक कथा प्रचलित आहेत. पण गोपींच्या कथा फारशा ऐकिवात नाहीत. शरद पौर्णिमेच्या रासाच्या खेळापुरतेच त्यांचे जनमानसातले स्वरूप सिमीत आहे. सर्वच गोपगोपी कान्हावर जवळजवळ तितकेच प्रेम करायचे असे मला वाटते म्हणून ह्या काल्पनिक गोपीला नायिका करून मी कथा लिहीण्याचा प्रयत्न केला आहे. सत्य गोष्टींचा आदर रहावा तरीही काल्पनिक गोपीला सुद्धा न्याय मिळावा म्हणून त्यांचे आपसातले कमीत कमी संवाद कथेत येऊ दिले आहेत. ही खूप साधी सहज कथा आहे. मी स्वानंदासाठी लिहिली आहे आणि वाचून तुम्हालाही आनंद मिळावा एवढा सरळ हेतू आहे.