“हां तर मी मूळचा पुण्याचा. हे तर तुला कळलंयच आता.” सिद्धार्थ बोलता बोलता हळूच तिच्याकडे पाहत म्हणाला.
“हो. कळलं... पुढे..?” निशाने सरळ प्रश्न केल्यावर जरा नाराजीनेच सिद्धार्थने पुढे सांगायला सुरुवात केली.
“हं.. तर माझं शिक्षण पुण्यातच झालं. अगदी इंजिनीरिंग होईपर्यंत मी पुण्यातून कधीच बाहेर कुठे गेलो नव्हतो. इंजिनीरिंग होऊन जॉब लागल्यावर मात्र पहिल्यांदा मित्र मैत्रिणींबरोबर ट्रीपला जायचं ठरलं.
मोठा ग्रुप होता आमचा. पण त्यातल्या काही मोजक्या लोकांशीच मी बोलायचो. खूप शांत होतो मी”
“काय सांगतोस? तू शांत होतास?” निशाने मध्येच त्याचं वाक्य तोडत विचारलं.
निशा वेळेत एअरपोर्टला पोहोचली. सिक्युरिटी वगैरे उरकून गेटला येऊन बसली. अजून boarding ला वेळ होता त्यामुळे तिने तिचं नेहमीचं काम करायचं ठरवलं. आजूबाजूचे लोक बघत बसणे. तिला काही मन वगैरे वाचता यायचं नाही पण माणसे बघणे हा तिचा आणखी एक विरंगुळा होता. ट्रेन स्टेशन, airport अशा ठिकाणी तर पर्वणीच! कारण १०० प्रकारची १०० माणसे. कोणी गडबडीत, कोणी मुलांना आवरून दमलेलं तर कोणी पहिल्या प्रवासाला निघाल्यामुळे खुश!
सारे चाफे गाव निद्रादेवीच्या आधीन झाले होते. गावात कोणाला कल्पनाही नव्हती की उद्याचा सूर्योदय गावासाठी एक भयमुक्त जीवन घेऊन अवतरणार होता, सारी संदिग्धता दूर करुन.... केवळ सुमीतमुळे !!!
आत्याच्या घरची उन्हाळी सुट्टी म्हणजे चंगळच. किती ते हुंदडणं, आंबे, फणस, चापणं, आजुबाजुची मुले जमवून समुद्रकिनारी वाळूत किल्ले करणं आणि या सर्वांवर कडी म्हणजे आत्याचे लाड करणं. तिच्या हातचे मऊ लुसलुशीत तांदळाचे घावणे, नारळाच्या रसातल्या शेवया, उकडीचे मोदक आणि ताज्या मासळीचं आंबट - तिखट कालवण.... अहाहा स्वर्गसुख ! सुमीतच्या तोंडाला या आठवणीनेच पाणी सुटलं. आता मनसोक्त लाड करुन घ्यायचे आत्याकडून.....आत्या...तिची मायेने ओथंबलेली नजर आजही तशीच डोळ्यांसमोर येते सुमीतच्या. आत्याला रागावलेली तर नाहीच पाहिलं कधी पण तिचा कधी आवज चढलेलाही सुमीतला आठवत नाही.
सारे चाफे गाव निद्रादेवीच्या आधीन झाले होते. गावात कोणाला कल्पनाही नव्हती की उद्याचा सूर्योदय गावासाठी एक भयमुक्त जीवन घेऊन अवतरणार होता, सारी संदिग्धता दूर करुन.... केवळ सुमीतमुळे !!!
घरी आल्यावर सुमीतने एक लिस्ट बनवली लॅपटॉपमध्ये. त्याच्या दॄष्टीने या वाड्याशी संबंधित संशयित व्यक्ती:- पाटील काका आणि मुकुंदा हा एक ग्रुप आणि दुसरा ग्रुप म्हणजे थोरले जमीनदार, विठू आणि कदाचित हे कारस्थान अवगत असलेली पण गप्प राहण्यास भाग पाडली गेलेली आत्या? ...
“हायला सुमीतराव तुम्ही तर एकामागोमाग एक सर्वांवरच संशय घेऊ लागले. अजुन चार-दोन दिवसांत सगळं चाफे गाव संशयितांच्या यादीत सामील नाही झालं म्हणजे मिळवलं.” सुमीत स्वतःशीच हसत बोलला. विचार करकरुन डोक्याचा भुगा झाला. आता सी सी टी व्ही फूटेज हाच एक मदतीचा मार्ग दिसत होता.
सुमीतला पटलं त्यांचं बोलणं. वाड्याची चावी थोरल्या मालकांकडेच असते. त्यामुळे आत शिरायचं तर नवी चावी बनवून घेणं हे पहिलं काम होतं. आता चावीवाल्याला इथे आणायचं तर तो तयार व्हायला हवा आणि त्याचं तोंड बंद ठेवायला हवं. आता काय करावं? मुकुंदा म्हणाला, "आधी आपण दोघं बाहेरुन अंदाज तर घेऊ मग बघू." ठरलं तर आज संध्याकाळीच शेवटची एस टी निघून गेली की वाड्याकडे कूच करायचं.
थोडंसं कळू लागल्यावर सुमीतच्या मनात कैक विचारांचं काहूर उठत असे. आत्याबद्दल, त्या वाड्याबद्दल. एव्हढी श्रीमंत असलेली आपली आत्या पतीनिधनानंतर गावातील मंदीराच्या आवारात असलेल्या दोन खोल्यांच्या साध्या घरात भाडोत्री म्हणून का राहते? या वाड्यात कोणीही न जाण्यामागे काय कारण आहे? खरंच काही घडलंय की केवळ अंधश्रद्धा? तो आपल्या आई-बाबांना त्याबद्दल विचारीत असे. तो जसजसा मोठा होत गेला तसतशा त्याला आई-वडीलांनी अनेक गोष्टी सांगितल्या. त्यानुसार त्याच्या मनातील शंका दूर होत गेल्या. घटनांची एकसंध साखळी मनात सांधली गेली, केवळ एक कडी निसटत होती... ती म्हणजे 'देसाई वाडा'.... तो असा का मानवविरहीत राहिला?