मी ते नेलपॉलिशवालं स्थळ पाहिलं. त्या दिवशी राग, नैराश्य, वैताग, त्रास अशा सर्व नकारात्मक भावनाच सोबत होत्या. घरी पोचल्या पोचल्याच मी कधी नव्हे ते वडिलांना उलट बोलले.
“ही असली स्थळं मी पाहणार नाही. कसा होता तो मुलगा?”
“अगं पण तिथे पोचेपर्यंत मला तरी माहित होता का तो कसा आहे ते?”
“वैतागले आहे मी या सगळ्या प्रकाराला.”
“बरोबर आहे तुझं. पण करायचं काय तेही सांग.”
“ते मला माहित नाही. मी आता पुण्याला येणारच नाहीये. किमान १५ दिवस तरी. म्हणजे ही कटकटच नको. मी एकटीनेच राहते. मला नाही पहायची स्थळंबिळं.”
खर म्हणजे ही कविता नाही, पण काव्यात्मक लिखाण आहे. इथे तसा काही गट सापडला नाही म्हणून कवितेखालीच लिहिते आहे. लिखाण जुनच आहे, आज फेसबुक मेमरी मध्ये आलंय म्हणून इथे पण :fadfad:
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
कधी कधी भल्या पहाटे अंगणात तर कधी थोडंसं उशिरा चहाच्या टेबलाजवळ भेटायचा.
स्वयंपाकघराच्या दाराच्या फटीतून येणारा तो देखणा कवडसा.
थंडीच्या दिवसात उबदार उन्हाची शाल घेऊन तांसतास घुटमळायचा अवतीभवती.
माझं गुणगुणत त्याला न्याहाळणं चालायचं.
आज अशक्य थंडी आहे. पण आता इम्युनिटी वाढलीय. नाहीतर मागच्या वर्षी याच दिवसात मी अनेक शारिरिक आणि मानसिक ताणातून जात होते. जरा काही झालं की अंथरूण धरावं लागायचं. पळण्याची कपॅसिटी वाढलीय. मला न दिसताही, कसलाही मेकपचा स्ट्रेक नसताना माझी मीच पळताना स्वतःला छान दिसतेय. म्हणजे मला छान वाटतंय. पॉवरफुल. एक मार्ग , एक ठरलेला मुक्काम. आता कुठलं वळण घ्यावं हा विचार करायचा नाहीय हे किती बरंय. किती वेळ लागतोय हेही एक अॅप सांगतंय, मोजतंय तुमची पावलं, गती आणि प्रगती. माझ्या मैत्रिणी पुढंमागं आहेत. एकटं पळण्याचे फायदे तोटे आहेतच. आत्ता मिळून पळण्याचे फायदे दिसतायेत.
मी आणि कविन सह्याद्रि नावाच्या एका अनरजिस्टर्ड नो प्राॅफीट नो लाॅस बेसिसवर चालणार्या ट्रेकींग संस्थेशी असोसिएटेड आहोत. सह्याद्रि ग्रुप हौशी ट्रेकर्ससाठी दर महिन्याला एक किंवा जास्त ट्रेक्स अरेंज करतो. या धाग्यात आम्ही अशा ट्रेक्सची माहीती देत जाउ. कुणाला यायचं असेल तर मला किंवा कविनला काँटॅक्ट करु शकता.
भेट ठरली की होते
भेटलास तरी होते
भेट संपत आली म्हणून होते
भेट संपली म्हणूनही होते
पुन्हा तू भेटावास म्हणून होतेच
तगमग
तू असलास की
तू हसलास की
तू पाहिलस की
तू बोललास की
तू नसलास की होतेच
तगमग
तू मिठीत घ्यावस म्हणून
मिठीत घेशील म्हणून
मिठीत घेतलस तरिही
मिठी सैल होताना आणि
मिठी निसटली तरी होतेच
तगमग!!!
माझं नाव नार्या - म्हणजे नारायण कांबळे पण नार्याच म्हणतात मला. शिक्षण - B.Com. तीन वेळा बसून नापास. सध्या क्लार्क आहे एका खाजगी कंपनीत. तर असा मी साधा-सुधा माणूस. पण गम्मत अशी आहे की सर्वांनाच मी साधा-सुधा नाही वाटत. पण लोकांचं काय, त्यांची आणि एखाद्याची मतं नाही जुळली की लगेच त्या माणसाला विचित्र ठरवून मोकळे! माझ्या शेजार्या-पाजार्यांनी , ऑफिसमधल्या सहकार्यांनी मला असच विचित्र माणूस ठरवलय. एवढच काय माझी आई सुध्दा कधी कधी माझ्या बोलण्यावर एकदम टीपं गाळते. म्हणते "देवा, कसं व्हायचं माझ्या या वेड्या लेकराचं?" आता मी काही वेडा आहे का? पण "जाऊ देत", मी म्हणतो.