बालवाडी ते दहावी या शैक्षणिक वर्षात माझ्या पाच शाळा झाल्या. पण त्याही आधी मी स्वतःची एक शाळा काढली होती.
मी लहान असताना काही वर्षं आम्ही एकत्र कुटुंबात रहात होतो. आम्हा भावंडात सगळ्यात मोठी चुलत बहीण विनया, मग माझे दोघं जुळे भाऊ शैलेश-महेश, त्यानंतर माझ्याहून थोडा मोठा माझा चुलत भाऊ अजय आणि सगळ्यात धाकटी मी.
आता आमच्या दोघींचे काय? पण हरून बसेल ती आई कसली. शिलाई तर ती करतच होती तशातच कारखाना सुरू ठेवायचा निर्णय तिने घेतला. कच्चा माल शिल्लक होताच. ती कधीही घराबाहेर पडली नव्हती. तरी दादांना ती प्रत्येक गोष्ट विचारून घ्यायची. मला वाटते त्यामुळेच दादा गेल्यानंतर ती कारखाना चालवताना काही डगमगली नव्हती. शिल्लक होता त्या मालापासून तिने परत मिश्री च्या पुड्या तयार केल्या. आणि अण्णाला सांगितले दुकानदारांना पोहोच करायला. पुण्याला पण तिने माल पाठवला. कच्चा माल मागविण्यासाठी ड्राफ्ट वगैरे काढून कसा पाठवायचा ते विचारायला ती घरमालकांच्या आप्पांकडे गेली.
माझे दादा कुठेही बाहेर निघाले की मला बरोबर घेऊन जात. सगळ्यांना सांगत हे आमचे शेंडेफळ म्हणून. माझ्या इतका त्यांचा सहवास माझ्या कोणत्याच भावंडांना मिळाला नाही. कारण ते जेव्हा लहान होते तेव्हा माझे दादा 1942 च्या लढ्यात उतरले होते. त्यामुळे सतत त्या कामात आणि जेलमध्ये असायचे. मला वाटते दादांची पण मुलांबरोबर राहायची हौस राहिली असेल त्यामुळे ते माझे खूप लाड करत, असे आता मला वाटते. विशेष म्हणजे माझ्या कोणत्याच भावंडांनी त्याबाबत माझा राग राग केला नाही. उलट त्यांनीही माझे लाडच केले. मला वाटते ते सगळे माझ्यापेक्षा वयाने मोठे असल्यामुळे असेल.
मी दुसरीत किंवा तिसरीत असेन. तेव्हा आम्हाला शाळेने कराड मधील मुतालिक वाडा आहे तिथे नेले होते. तिथे एक जण आम्हाला मुलांना गोष्ट सांगत होते.,'शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ'. तर ते गृहस्थ मला खूप आवडले. त्यानंतर ते एक दिवस चाळीतील कुणाकडे तरी आले होते, मी त्यांना कुठे पाहिले हे विसरून गेले होते. मी तिथेच खेळत होते. त्या ग्रस्तांना पाहिल्यावर का कुणास ठाऊक मला वाटले की हे माझ्या दादांचे मित्र आहेत. त्यामुळे मी दोन-तीनदा त्यांना म्हणाले की माझे दादा घरी आहेत. त्यांनाही वाटले कोण हिचा दादा आहे बघूया. मला म्हणाले चल तुझ्या दादांकडे.
युरोप मध्ये सार्वजनिक स्वच्छतागृहात ९५ टक्के वेळा स्वच्छता असते. स्वित्झर्लंड मध्ये तर सुबक सजवलेली अनेक टॉयलेट्स पाहिली होती. मग इथे आता काय वेगळं असेल? मी फोटो पाहिले नव्हते, फक्त गुगल वर याबद्दल वाचलं होतं.
तिथे पोचल्यावर बाहेरून तसे नेहमी सारखेच वाटले. आत टॉयलेट पेपर, hand wash, गरम पाणी, हात पुसायला कागद हेही होतं. आणि एका भिंतीला पूर्ण काचेची खिडकी होती, ज्यातून पलिकडे वाहणारी नदी दिसत होती. And even before I realized I went back to औरंगाबाद एसटी स्टँड.
माझ्या आईने तिच्या बालपणापासूनच्या आठवणी लिहिल्या आहेत, आणि त्या इथे सगळ्यांसोबत शेअर करायला मला परवानगी दिली आहे. भाग एक टाकला आहे. मैत्रिणींना वाचायला आवडल्या तर पुढचे भाग टाकेन.
परवा ६/६ म्हणजे ६ जून हा जागतिक इकेबाना दिवस आहे. म्हणून या दिवसाचं औचित्य साधून इथे हा लेख आणत्ये. माझ्या अंगात अजिबात कलाकुसर नाही. त्यामुळे माझ्या फोटोग्राफीच्या “कौशल्या”कडे दुर्लक्ष करा :) बरेचसे फोटो खूप जुने आहेत.
चॅप्टर १ : स्ट्रेन्जर इन माय हाउस
साधारण १९९९-२००० च्या आसपास राम गोपाल वर्मा-उर्मिला मातोंडकर-मनोज वाजपेयी या जबराट कॉकटेलचा अत्यंत स्केअरी थ्रिलर मुव्ही आला होता, ‘कौन’ !
एका रात्री उर्मिलाच्या घरात एक स्ट्रेन्जर घुसतो आणि सुरु होतो एक लपाछपीचा ट्विस्टस ने भरलेला थरार.. नक्की कोण कोणाला थ्रेट आहे, कोण कोणाला घाबरतय..प्रेक्षक पार कनफ्युज होतात !
तसाच काहीसा थरार गेल्या शुक्रवारी आम्ही अनुभवला !
२२ मे २०२६
मेमोरिअल डे लाँग विकेन्ड असल्यामुळे शुक्रवार दुपार पासूनच सगळीकडे सुट्टीचं वातावरण होतं !
माझ्या मराठी मातीचा
लावा ललाटास टिळा
हिच्या संगाने जागल्या
दऱ्या खोऱ्यातील शिळा
मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा ! /\
माझे आजोबा मला म्हणायचे "वाणी प्रसन्न आहे तुझ्यावर, सुपारी खात जाऊ नकोस. शारदेला रुष्ट करू नकोस." वाणी म्हणजे नेमकं काय हे आताही कळालेलं आहे की नाही माहीत नाही. वाणी म्हणजे आपल्या मुखातून (किंवा लेखनातून) बाहेर येणाऱ्या शब्दांतील ऊर्जा असावी... कदाचित.