'मराठी भाषेची गंमत' या धाग्यावर रायगडची पोस्ट वाचून मी फार पूर्वी देवनागरीबद्दल लिहिलेलं आठवलं. मी या विषयातली तज्ज्ञ नाहीये, सहज आवड म्हणून गोळा केलेली माहीती आहे.
--
भारतात लेखनकलेचा उगम कधी झाला हे पुरेशा पुराव्यांअभावी शोधून काढणं कठीण आहे. यावर बरीच मतमतांतर आहेत. तरीही, अशोकन शिलालेख म्हणून ओळखल्या जाणार्या दगडावरील शिलालेख हे भारतीय लेखनाचं उदाहरण मानलं जातं. हे शिलालेख दोन लिपींमध्ये लिहिलेले आहेत: एक खरोष्टी आणि दुसरी ब्राह्मी. खरोष्टी लिपी ही प्राचीन इंडो-इराणी लिपी. ख्रिस्तपूर्व तिसर्या शतकात सध्याच्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये याचा वापर करण्यात आला. ब्राह्मी लिपीत जे शिलालेख सापडले यात काही सध्या वापरात असलेल्या देवनागरीतली अक्षरं आहेत आणि त्यावरुन देवनागरी ही ब्राह्मीतून जन्माला आली असा सर्वसाधारणपणे निष्कर्ष काढण्यात आला आहे.
शिकत असताना क्लास मध्ये सगळे माझ्या सारखेच शिकाऊ होते, नीट विचार करून आणि रोजच्या अभ्यासातून वाक्यरचना, व्याकरण हे सगळं जास्तीत जास्त बरोबर जमवता यायचं, तसा वेळ पण मिळायचा. पण बाहेर तेवढा वेळ ना समोरच्याचं ऐकायला मिळायचा ना बोलायला. समोरच्याचं ऐकून प्रोसेस करून त्यातल्याच एखाद्या शब्दावर गाडी अडून बसली की उत्तर अजून लांबायचं. मग यातून कधी वाक्यरचना चुकायची, कधी शब्दच आठवायचे नाहीत. किंवा व्याकरण आठवून बोलताना एक वाक्य पूर्ण व्हायलाच खूप वेळ लागायचा. या भाषेतून आपण आपला मुद्दा समोरच्याला सांगणे हा एकच उद्देश ठेवला तर सहज बेसिक बोलता यायचं.
जर्मन आणि जर्मनी हे दोन वेगळे शब्द आहेत हेच मूळात अनेकांना माहीत नसतं. तर जर्मनी हा देश आहे आणि त्यांची जर्मन ही भाषा आहे. याच जर्मन भाषेला मूळ भाषेत दॉइच (Deutsch) हा शब्द आहे तर जर्मनीला दॉइचलांड (Deutschland) हा शब्द आहे. या लेखात जर्मनीतल्या वास्तव्यातला भाषा शिकण्याचा प्रवास, अनुभव, भाषा येत असण्याचे बरे वाइट परिणाम, बदलत गेलेला दृष्टीकोन, भाषा अंगवळणी पडण्याचा प्रवास याबद्दल.
पंचवीस डिसेंबरची सुट्टी यापलीकडे लहानपणी कधीच नाताळशी फार संबंध आला नाही. जपानला गेले तेव्हा विमानतळावर अगदी सिनेमात पाहिल्यासारखं सजलेलं ते ख्रिसमस ट्री प्रत्यक्ष बघून एक फोटो काढला होता. जर्मनीत आल्यापासून तर ख्रिसमस आणि त्याआधीपासूनची दिसणारी तयारी सगळं जवळून अनुभवलं, त्यातही खास जर्मन लोकांच्या परंपरा समजत गेल्या. गणपती, दिवाळीसोबतच ख्रिसमसच्या पण दर वर्षीच्या आठवणी आता जमा झाल्या.
बाहेर खाण्याच्या बाबतीत अनिवासी भारतीयांमध्ये दोन प्रकारचे लोक दिसतात, एक ज्यांना इथेही बाहेर रेस्टॉरंट मध्ये भारतीय जेवण आवडतं आणि दुसरे ज्यांना ते आवडत नाही. जे इथे बाहेर भारतीय नको असे म्हणणारे असतात, त्यांची कारणं वेगवेगळी असू शकतात. कुणी म्हणतात की घरी ते खातोच, पुन्हा बाहेर काय तेच? कुणी म्हणतात की इथे भारतीय म्हणजे फक्त पंजाबी, त्याच चवी सगळीकडे त्यापेक्षा ते नको, किंवा अजून काही आपापली कारणं असू शकतात. तर काहींना भारतीय पदार्थ आवडतात म्हणून, घरी स्वयंपाकाचा कंटाळा आला म्हणून तिथे जायला आवडतं.