कविता

सूर्य माध्यान्हीचा

वेचता सूर्य माध्यान्हीचा
सांजस्वप्न डोळ्यांत रेखले,
गंधवेड्या फुलांचे पुरे झाले कौतुक सोहळे
थोडा पाचोळाच वेचून सजवूयात संगे.
नकोच ती रेशमी सांज केसरफुले,
नकोच जिवाला तो मृगातला गारवा,
संगतीने तुझ्या निष्पर्ण फांद्यांतून झिरपता
रखरखीत ऊन होईल की मधाळ, हळुवार रे सखया.
हक्काच आपल ऊन, कशा झुरावे सावलीसाठी
चल पाहुया तळपून आज आपल्यासाठी,
चल पाहुया तळपून आज आपल्यासाठी.
- उज्वला

Keywords: 

कविता: 

विठूराया

screenshot_2025-07-08-22-29-55-23.png' तो ' विठूराया पाठीराखा
' ती ' साथ हवी रुख्माबाईची
सार्‍यांच्या काळजीचा भार डोई
भक्कम आधारास वीट पायीची ...
गुंतविती भक्तांच्या आणा-भाका
घालूनी गळ्यात तुळशीच्या माळा
जय जऽय राम कृष्ण हऽरी
म्हणत लावती बुक्का कपाळा ...
हिवे गोठता काया,ऊब तव पाया
आसरा देशी पाऊसधारा घेता झेप
कडक उन्हाहून असह्य संसारताप
तुझ्या नामाचा लावू चंदनलेप ...
अलौकिक तेज तव मूर्तीत

कविता: 

रे मना

माझा माझ्या मनाशी संवाद होत असताना अशाच सुचलेल्या चार ओळी

तुझ्याशी बोलले की मला मी अधिक आवडायला लागते
दैवाने खरंच सौंदर्य बहाल केलय हे पटायला लागते
तुझे हे असे प्रेम करणे हवेहवेसे वाटायला लागते
त्या प्रेमावर प्रेम करावेसे मलाही वाटू लागते
तुझ्याशी बोलताना, तुला मी दिसत असते आणि मलाही मीच दिसत असते
तू एक माध्यम आहेस, माझे स्वतःवरंच प्रेम करणे दिवसागणिक वाढते आहे
माझ्यासाठी तुझे अस्तित्व, माझ्या अस्तित्वासाठी अत्यावश्यक भासते आहे.

कविता: 

अंगारिका

अंगारिका

img_20240625_075747_444.jpg
असते विशेषताप्राप्त चतुर्थी
अंगारिका तिला म्हणती
आर्तस्वरे गाती धाव-पाव रे
गणेशा,गजानना,गणपती

विविध रुपात शोभसी
भालचंद्रा,गजवक्त्रा,वक्रतुंडा
लालफुलांची शाल पांघरसी
प्रिय दुर्वांकुरे सजली शुंडा

ॐ कारे आळवती प्रथमेशा
मधुर गायने वादने तुष्टसी
विध्नहर्ता तू संकटनाशका
शरणागतांवर कधी ना रुष्टसी

कविता: 

तू जेव्हा श्रावण बनून आला

तू जेव्हा श्रावण बनून आला,
पाचूचा सागर होता उसळला
तू बनून येता बहर पारिजातकाचा,
देहच झाला माझा, फाया अत्तराचा.
तू बनून येता माझा बसंत,
श्वासांनाही ना मिळे जरा उसंत.
तू शिशिर बनुनी आला,
झाले आयुष्यच पाला पाचोळा...
मौनच उरले जरी आता अंगणी,
देह अडकुन आहे, अजून मोहाच्या रिंगणी...

कविता: 

रक्षा-बंध

द्यावा या फुलांनी सुगंध
सुगंध माझ्या शब्दांना
जोडत नवा बंध मनामना
गोडवा जावा चहुदिशांना

नकोत रुतणारे काटे
शूल हृदया रक्ताळणारा
स्नेहिल मृदु प्रवाह
पाझरावा झुळझुळणारा

श्राव्य कोमल स्वर ऐसे
मिळावी तृप्तता कानांना
मिटती डोळे नकळत
ओलावा ना कळे पापण्यांना

शब्द-अर्थ एक भाव-बंध
असे दक्ष लक्ष्यपूर्तीसाठी
सक्षम,सशक्त रक्षा-बंध
सांगे मुक्ता-ज्ञाना आम्हांसाठी

विजया केळकर______
नागपूर

कविता: 

जेव्हा वयाची पंच्याहत्तरी येते — २

जेव्हा वयाची पंच्याहत्तरी येते —२
**************************
चक्क काहीतरी लिहावे वाटतय
म्हणजे मी म्हातारा झालोय?
अवघे पंच्चाहत्तरावेच तर सरतेय
किती ही कलकल?मीच गप्प बसतोय....

सूनेने उशीर झाला समजून दिला चहा
मुलाने हातातले वर्तमानपत्र ठेवलं समोर
सौ ने माझ्या कपाळाला लावला हात
तोंडाने बडबड,वैताग,जीवाला घोर....

आऽज्जोऽ ओरडत नातवाची बाॅलिंग
कप-गडी बाद दर्शवी माझ्यातला अंपायर
बाबा-ढगोबांचा गडगडाट परिणामी रडारड
बसणार वीजेची चपराक बाल-गालावर ....

कविता: 

जेव्हा वयाची पंचाहत्तरी येते

गतआयुष्याकडे वळून बघते
जेव्हा वयाची पंचाहत्तरी येते

पुसट झालेले बालपण स्यष्ट दिसते
टकमका मणी ओंजळीतले पहाते
रिबिनीची फुले उडवत धावतच सरते ||गत ....

नकळत अल्लडपणा लाजणे शिकते
महाविद्यालयीन तरुणी यशा गाठते
स्वमत मांडायाचे कसब शिकते || गत.....

पण..परतु विना सुखी संसार थाटते
बाई,बाई...भाग्यास हसरेच मुख दावते
नमते घेत तेही मग हसतच प्रत्युत्तरते || गत...

आज एक एक सखी आठवते
जुन्या मैत्रीशी तासन् तास गप्पा करते
आनंदिता नव्या मैत्री गटात समरसते ||गत...

कविता: 

उड्डाणपूल

सुरुवातीची ओळ बा. भ. बोरकरांच्या सुप्रसिद्ध कवितेवरून सुचल्यामुळे त्यांची मनापासून क्षमा मागत आहे.

खूप या पुलास फाटे
एक जाया, कैक याया
सायंकाळी अन् सकाळी
वेळ हा जाणार वाया

विमाने देशी-विदेशी
उतरती ती उत्तरेला
मार्ग हैद्राबाद जाण्या
होय तोही त्या दिशेला

रिंगणे वा कंकणे दो
बंगळूरूच्या सभोती
नाव त्यांचे रिंग रोड
आहे सर्वांच्याच खाती

ओलांडुनी त्या रिंग रस्त्या
प्रवेशिण्या शहरामध्ये
वाहनांची रांग येथे
पुलावर्ती चढू लागे

Keywords: 

कविता: 

पाने

Subscribe to कविता