सत्याचा शोध हा मनुष्याच्या डोक्याला लागलेला कायमचा भुंगा आहे. सापडलेलं फळ खाण्याजोगं आहे की नाही, पाऊस पडेल की ऊन अश्या प्रश्नांपासून कदाचित सुरुवात झाली असेल; पुढे समोरचा माणूस मित्र असेल का शत्रू, दिवस रात्र का होतात, प्रत्येक जिवाच्या जगण्याचं काय प्रयोजन इथपर्यंत. माणसाला प्रश्नच प्रश्न पडत गेले. एक उत्तर मिळून ही प्रश्नशृंखला थांबत नाही ते एक, दुसरं म्हणजे मिळालेली उत्तरंही वेळोवेळी तपासून बघावी लागतात. कधी कधी जुने सिद्धांत पुढे चुकीचे ठरतात, नवे पुरावे हाती लागतात. याला आपण साधारणपणे प्रगती असं म्हणतो.
लंडनला पहिल्यांदा आले तेव्हा हातात नोकरीचे पत्र आणि चार दिवस राहायची एका बेड आणि ब्रेकफास्टच्या ठिकाणी सोय एवढेच होते. ना कोणी ओळखीचे आणि जे कोणी ओळखीच्यांच्या ओळखीचे त्यांचीही फार काही मदत करायची तयारी नव्हती. त्यामुळे तिथे पोहोचल्यावर बघुयात असा विचार म्हणण्यापेक्षा दुसरा पर्यायच नव्हता. नावाला शासकीय नोकरी, पण तोपर्यत सरकारी कर्मचारी या प्राण्याबद्दल भारतात जे काही माहित होते, ते काहीच या देशात लागू पडत नाही, हे कळू लागले होते. सुरुवातीचे काही दिवस, आठवडे इकडे तिकडे काढल्यावर एक आत्येभाऊ इथे असल्याचा शोध लागला.
घरावर वस्तीला यायचे तर आधी वहिवाटीची सोय बघायला हवी . वसंत ग्रीष्माच्या सीमारेषेवर इथे आले त्यामुळे सगळीकडे फुलापानांचा बहर होता . दिवस बऱ्यापैकी मोठा त्यामुळे उशिरापर्यंत उजेड असायचा . बाहेर लोक दिसायचे , बऱ्यापैकी चाहूल होती आणि पहिले काही दिवस सामान टाकून ऑफिसच्या वाऱ्यांसाठी मी बाहेरच होते. एक दिवस मध्यरात्री नंतर पोहोचले , असंही सगळं सामसूम असतंय , त्यादिवशी गडद अंधार , गाडी ते घराचे दार ५-७ मिनिटं लागतात, त्यात चढ, मग लागणारा दरवाजा आणि मग घराचं दार, काहीच दिसत नव्हते. सोलर लाईटस मिणमिणते प्रकाशायला पण सूर्यप्रकाश मिळत नव्हता. वाट आणि प्रकाशाची सोया करणं क्रमप्राप्त होतं.
मार्टिन , मॉली आणि मिंटी M x३ - मार्टिन बाप, मॉली, मिंटी जुळे भाऊ बहीण, त्यांची आई एक दीड वर्षाआधी गेली. घर बघायला आले तेव्हाच ऍडमनी विचारले होते, 'तुला मेंढ्या हव्यात का?' हजारो ख्वाहिशें मध्ये मेंढ्या कधीच नव्हत्या त्यामुळे मी बावचळून बघितले त्याच्याकडे.
'...तीन एकरची जागा साफ कशी ठेवशील - मेंढ्या असतील तर गवत फार वाढणार नाही ...'
'पण त्यांच्या निगेचं काय?'
चक्रावला असशील ना हे पत्र पाहून ?
ठाऊक आहे मला. म्हटला असशील, आता हिचे आणखी काय नवीन ? आयत्या वेळी कशा बरे नेमक्या काहीतरी शंका? वगैरे वगैरे..
नाही, शंका वगैरे नाही. आपण उद्यापासून एकत्र रहायला सुरुवात करणार, त्याधी मला हे तुला लिहून द्यायचे होते. बोलूही शकले असते पण हे मला कागदावर उतरवायचे होते. आपण काही लग्न करत नाही आहोत. ना सप्तपदी, ना टोस्ट (आजकालच्या लग्नात करतात तसे). तसे आपल्या बाबतीत काहीच कन्वेन्शनल नाही ना? तसेच हे पत्रही समज. आपल्या एकत्र राहण्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर मला हे अपडेट करत राहायचे आहे..म्हणूनच हा पत्राचा उद्योग.
उतड धाग्यावर वृंदाने लच्छीच्या मोराची आठवण काढली. मग मला 17-18 वर्षांपूर्वी माबो दिवाळी अंकासाठी लिहिलेलं काहीतरी आठवलं. ते इथे आणायला योग्य आहे असं वाटलं. मलाही माझं लिखाण परत वाचायची गरज होतीच.
------
एकदाची ठकू लिहायला बसली तिनं ठरवलं आपल्या सगळ्यात आवडत्या मैत्रिणीवर, नाचर्या लच्छीवर लिहायचं. ठकू लिहायला बसली आणि लच्छी काही नाचून दाखवायला तयार नाही. कंटाळून ठकी तिथून उठायला लागली आणि लच्छी समोर येऊन बसली. "अशी कशी गं तू? लच्छी सापडायची तर लच्छी बनायला नको? ये चल टाक पावलं माझ्याबरोबर.." ठकूचा हात धरून लच्छी घेऊन गेली.
खूप दिवसापासून एखादा हलकाफुलका / अगदी डोके बाजूला काढून ठेवता येइल असा कार्यक्रम बघावा अशी इच्छा होत होती. नेटफ्लिक्सवर "डायनिंग विथ कपूर्स" नावाचा कार्यक्रम दिसला. अगदी १ तासाचा असल्याने फार कंटाळा येणार नाही आणि टाइमपास होइल ह्या आशेने चालू केला.
राज कपूरच्या १०० व्या वाढदिवसाचे निमित्त साधून त्याच्या नातवाने अरमान जैन कपूर कुटुंबियांसाठी एक जेवण आयोजित केले होते. अरमान जैनने कपूर कुटुंबियांचे आवडीचे पदार्थ, राज कपूर ह्यांच्या पत्नी कृष्णा कपूर ह्यांच्या रेसिपीज स्वतः बनविल्या होत्या. शशी कपूर आणि शम्मी कपूर ह्यांच्या काही कुटुंबिंयानीसुद्धा येथे हजेरी लावली होती.