"काय म्हणावं बाई या महागाईला!! कालच्यापेक्षा आज जास्त तर आजच्यापेक्षा उद्या अजुन वाढलेली!!"
"काय सान्गता.. दुध ५० रुपये लिटर?? अहो, दहा वर्षापुर्वी २० रुपयला मिळायचं लिटरभर!"
"कितीही काटकसर करा, पैसा कमीच पडतो"
....ही आणि अशी वाक्य आजुबाजुला तुम्हीही ऐकली असतीलच ना मैत्रिणींनो?
मुळात पैसा कितीही कमवा, पुरतच नाही ही खंत प्रत्येकालाच सतावत असते. खर्च वाढलेत की महागाई हेच कळत नाही. आपणही श्रीमंत व्हावं, कसलीही चिन्ता न बाळगता खर्च करण्याइतके पैसे आपल्याकडे असावे अशी सगळ्यांची इच्छा असते. त्यासाठी मग आपण बँकेत पैसे साठवतो, एफ डी करतो, पण अपेक्षित परिणाम मिळत नाही.
This is the best part about the ‘armed forces’. दर २-३ वर्षांनी नवीन जागा, नवीन ओळखी, नवीन मित्र मैत्रिणी !
पण जरी नवी नाती जुळली तरी आधीची नाती पुसट नाही होत… उलट अजूनच घट्ट होतात.. लोणचं कसं मुरत जातं…. तशीच !
भलेही तुम्ही वर्षानुवर्ष एकमेकांपासून लांब असलात तरी जेव्हा कधी भेटीचा योग येतो तेव्हा असं वाटतं जणू काही कालच भेटलो होतो, मधली सगळी वर्षं अचानक नाहीशी होतात! आणि हे फक्त ऑफिसर्स बद्दलच नाही बरं का! Ladies आणि मुलांच्या बाबतीतही हाच नियम लागू पडतो.
पण यामधेही काही नाती ही खूप स्पेशल असतात. अगदी खासम् खास …..“नवऱ्याचे कोर्समेट्स आणि त्यांचे परिवार” …
आज १२ जून. सतरा वर्षांपूर्वी याच दिवशी आमचे बाबा आम्हांला कायमचे सोडून गेले. आज इतक्या वर्षांनंतर अचानक बाबांबद्दल लिहावंसं वाटतंय!
मी कॉलेजमधे असताना कधी कधी बाबा उगीच आमची काळजी करायचे ना तेव्हा मी त्यांना सांगायची,” कशाला एवढं टेन्शन घेता बाबा? बी पी वाढेल तुमचं.” तेव्हा ते म्हणायचे ,” जब तुम बाप बनोगी तब पता चलेगा।” त्यावर मी चेष्टेत उत्तर द्यायची,” फिर तो मुझे कभी पता नहीं चलेगा, क्यूँकी मैं तो माँ बनूँगी।”
मला कधी पासून जपानी खाद्यसंस्कृतीवर लेख लिहायचा आहे पण त्या विषयाचा आवाका एकतर प्रचंड आहे आणि त्यात माझ्या डोक्यात इतके काही आहे की ते सलग उतरवून होणार नाही. तेवढा वेळ पण नाही आहे सध्या. कदाचित अशा छोट्या छोट्या गोष्टींचे काही लेख लिहू शकेन.
तर सुरूवात बेंतो पासून. कारण हा पण जपानी खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य घटक आहे आणि डब्यातला खाऊ या धाग्यावर बर्याच जणींना हे बेंतो प्रकरण आवडले म्हणून हा लेखप्रपंच!
मी शाळेत असताना कधीतरी (नक्की साल लक्षात नाही) एकदा मी संध्याकाळी घरी आले तेव्हा आई बाबा बाहेर गेले होते. दिंदीला (माझ्या मोठ्या बहिणीला) विचारलं तर ती म्हणाली,’ सोहोनी काकूंकडे गेलेत.”
ते ऐकताक्षणी मी आनंदानी उडालेच. त्याला कारण ही तसंच होतं. काही दिवसांपूर्वी सोहोनी काकूंनी (आमच्या आईची मैत्रीण) आईला फोन केला होता .. त्यांच्या ‘डॉली’ नावाच्या पॉमेरिअन कुत्रीला पिल्लं झाली होती . ‘त्यातलं एखादं पिल्लू तुम्हाला हवं आहे का?’ या त्यांच्या प्रश्नाला आम्ही खूप जोरात ‘ होsssss ‘ असं उत्तर दिलं होतं. आणि त्या दिवशी त्यातल्याच एक पिल्लाला घरी घेऊन यायला आई बाबा काकूंकडे गेले होते.
*माझी सैन्यगाथा (भाग २)*
आम्ही दिब्रूगढ पर्यंत विमानानी गेलो पण तिथून पुढे मात्र आम्हाला by road च जायला लागणार होतं. दिब्रूगढ एअरपोर्ट वर आमच्यासाठी आर्मी ची जीप आली होती. त्या वेळी पहिल्यांदा त्या जीप मध्ये बसताना मला जो आनंद, जे समाधान वाटत होतं, ते शब्दातीत आहे!
माझा जन्म पुण्यात झाला. माझं बालपण च काय पण किशोरावस्थेचा तो सप्तरंगी काळ ही मी पुण्यातच अनुभवला. थोडक्यात सांगायचं तर माझं लग्न होईपर्यंत मी पुण्याच्या बाहेर फारशी गेले नाही.
लहानपणापासून मला 'आर्म्ड् फोर्सेस्' बद्दल जबरदस्त आकर्षण होतं. दरवर्षी २६ जानेवारी ला दूरदर्शन वरून प्रसारित होणारी गणतंत्र दिवसाची परेड बघणं म्हणजे माझ्यासाठी पर्वणीच असायची. दिल्लीच्या राजपथ वरुन शिस्तबध्द आणि तालबद्ध रीतीनी मार्च-पास्ट करत जाणारे ते सैनिक बघताना मला नेहमीच अभिमान वाटायचा. आणि सिनेमात दाखवतात तसं बऱ्याच वेळा त्यातल्या परेड कमांडरच्या जागी मी स्वतःला बघायचे.
पैसा आणि मानमरातब नात्यात आला कि नात्यांच्या झाडाला इजा होतेच, त्याची मुळे सैल होतातच. आणि मग या झाडाला आवश्यक असणारी प्रेमाची माती, जिव्हाळ्याचे पाणी आणि आपुलकीचे क्षार कितीही प्रयत्न केला तरी ह्रदयाच्या गाभ्यापर्यंत पोहचत नाही.
निस्सीम प्रेम, आपुलकी यांच्या जोरावर परक्यांनाही आपलंस करता येत, पण… पैसा नसेल तर आपलेही परके कधी होतात समजत नाही. किती विचित्र आहे माणसाचं वागणं? “भौतिक सुखाच्या गारपिटीसाठी नाती तोडणारी माणसे आणि किंचितशा प्रेमाच्या शिड्काव्यासाठी नाती जोडणारी माणसे” यामध्ये हाच तर फरक असतो. हेतुपुरस्य नाती कधीच टिकत नाहीत, त्यांचा आधारच स्वार्थ असतो.
प्रभात रोडला राहणार्या पांढरकवडे काकूंनी लिहिलेला लेख नुकताच (पुन्हा) वाचनात आला. ('प्रभात रोडला राहणार्या' असं लिहिलं त्याला कारण आहे. आईला पांढरकवडे आडनावाच्या तीन मैत्रिणी आहेत. एक प्रभात रोडला राहतात, दुसर्या बिबवेवाडीत आणि तिसर्या सिडनीत!) आईने त्यांच्यासाठी दिलेलं पार्सल (अर्धा किलो उपवासाची भाजणी. आमच्या घराशेजारच्या किराणादुकानात त्यांच्या घराशेजारच्या किराणादुकानापेक्षा पंचाहत्तर पैशांनी स्वस्त मिळते. खेरीज रोज मी जीआरईच्या क्लासला त्यांच्या घरावरूनच जाते.) त्यांच्याकडे पोचवायला गेले होते, तेव्हा त्यांनी लॅमिनेट करून घेतलेलं लेखाचं कात्रण हळुवारपणे माझ्या हातात ठेवलं.