शुक्रवारी रात्री बाहेर जेवून आम्ही दोघे घरी आलो आणि फोन वाजला. पल्याड आजी!
"का गं? इतक्या उशिरा फोन? काय झालं?" मी जरा धसकूनच विचारलं. माझ्या रात्री उशिरा भारतातून फोन आला की, मला आधी भीतीच वाटते.
"काय व्हायचंय? काही नाही. आमच्याकडे दहाच वाजलेत अजून. अजून 'कैसे मै जिऊ तेरे बिन?' सुरू पण झाली नाही. पण आत्ता एक 'ब्रेकिंग न्यूज' आहे." आज्जीची ब्रेकिंग न्यूज म्हणजे टीव्हीवरल्या कुठल्यातरी मालिकेबद्दलच असणार. देवपूजेआधी 'सास, बहू और साजिश!' नेमाने बघणारी आहे माझी आज्जी!
“करवा चौथ’’ हा सण नुकताच मोठ्या आनंदात साजरा केला गेला. खरं तर, हा सण नाही. पण यश चोप्रा, करण जोहर आणि तमाम टी.व्ही. channels च्या कृपेने हा एक सण बनला आहे.परवा एका छोटयाशा city news नावाच्या पत्रिकेतही एका दाक्षिणात्य मुलीने आपण “करवा चौथ” हा कसा साग्रसंगीत साजरा केला हे सांगितले होते. हे सगळे वाचून, पाहून मनात अनेक विचार येतात.
तिळी चतुर्थीचा दिवस. आम्ही अशोकनगरवासी ( म.प्र. ) महाराष्ट्रीयन मंडळी जवळील 'शाढोरा'
गावातील गणपती मंदिरात बाप्पाच्या दर्शनास अगत्याने जायचो.ज्यास ज्या बसने, ट्रेनने किंवा स्वत:च्या
वाहनाने जसे जमेल तसे. क्धीत्यास छोट्या सहलीचे रूप यायचे. मंदिर पेशवेकालीन आहे. जवळ मंदिराची
शेतजमीन ,आमराई पण आहे.
त्यावर्षी मुलांच्या शाळेत परीक्षा व ह्यांना सुती घेता येणार नव्हती.मुलं व त्यांचे वडील घराबाहेर पडल्यावर
आपण 'श्री गजानन विजय 'या ग्रंथाचे पारायण करावे असे मी मनातच ठरविले.त्याप्रमाणे तयारीस लागले.
(खरं तर ही गोष्ट लिहायची. पण ते काही "मेरे बस की बात" नाही. कविन, मेघना दोघींनी छान टिप्स दिल्या खरं तर. पण कसय ना, जातीची कलाकार असल्याने एकदा लिहिलेल्यावर त्यावर संस्कार वगैरे जमत नाय आपल्याला :ड खरं तर, आळशीपणा दुसरं काय? {) तरी थांबले बरं 10-15 दिवस. पण कायच सुचेना. मग म्हटलं जाऊ देत. लेख म्हणूनच खरडलेलं टाकूत. वाचतीलच काही मैत्रिणी साहित्याचे नियम बियम न लावता वाचा बाई :ड
तर ही घडलेली घटना. नावं अर्थातच बदललीत. मे बी काही उपयोगी पडेल, मेबी यावरून काही चर्चा रंगेल. प्रास्ताविक मजेचे झाले पण खालचा मजकूर मात्र मजेचा नाही)
---
"अगं चल ठेवते मी फोन...बोलू परत " असं म्हणून मेघानं तिच्या ऑफिसमधल्या मैत्रिणीचा फोन ठेवला. "अगं आई, त्यांनी टॉस जिंकलाय, अँड decided to बॅट, ये लवकर, सुरु झाली मॅच "
"अरे देवा, हो का... त्यांनी जिंकला टॉस, पण ठीक आहे, खेळतील आपल्या पोरी चांगल्या... आलेच मी, स्वयंपाक उरकलाय लवकरच, राहिलेली आवराआवर करते आणि आलेच ५ मिनिटात. "
" झाली का गं मॅच सुरु, मी पण अगदी प्रत्येक बॉल बघणार आहे बाई..." मेघाची आजी आतल्या खोलीतून बाहेर येत म्हणाली. तिला असं लगबगीनं बाहेर येताना पाहून स्वतः सोफ्यावर निवांतपणे टेकत बंडोपंत बोललेच, "आजी तुला काय कळतं गं क्रिकेट मधलं..."
काल एका मोठ्या ब्रँड च्या दुकानात गेले होते.लहान मुलांचे कपडे छान होते.जीन्स पाहिल्या, तर 3 ते 4, 5 ते 6, 7 ते 8, 9 ते 10 अश्या वयाच्या रेंज मध्ये मुलींच्या जीन्स, फक्त उंची वाढते.पायांची रुंदी सर्वांची अतिशय बारीक.9 ते 10 वाल्या जीन्स च्या पायांची रुंदी 2.5 इंच होती(म्हणजे टोटल 5, आणि स्ट्रेच ने अगदी कमाल स्ट्रेच करून 6 इंच.)जीन्स ला प्रत्येक ठिकाणी हा प्रश्न येतोय.एकतर अगदी कुपोषित बारीक लेग्स असलेली मुलगी असा, नाहीतर होजियरी लेगिंग विकत घ्या.हे लेगिंग स्टॅयलिश अंकल लेंग्थ फार कमी ब्रँड चे मिळतात.बाकी सगळे 'पंजाबी ड्रेस सुरवार टाईप चुण्या'.टीशर्ट च्या खाली घातल्यास अत्यंत विचित्र दिसतात.म
हाय, कसा आहेस?
मनमौजी तू, त्यामुळे हा प्रश्न तुझ्याबाबतीत इन-व्हॅलीड ठरतो म्हणा... सरळ मुद्द्यावरच येते.
तुझे परतायचे दिवस जवळ येऊ लागलेत, म्हणून म्हटलं आधीच तुला सांगून टाकावं... एकदा आलास की तू कुठचा ऐकतो आहेस मला...
तुला आठवत का रे, कधी सुरू झालं आपलं हे सगळं?... सगळं म्हणजे... हो बाबा, बोलते स्पष्टच... अफेयर!
मला तर आठवतच नाही, किती मागे गेले तरी तू आहेसच सोबत.
तुझ्याशिवाय जगले तरी आहे का कधी, असं वाटू लागलं आहे आता... असं काय आहे आपल्यात जे अजून कायम आहे? तेच शोधून काढायचा प्रयत्न करतेय... म्हणजे समूळ नष्ट करता येईल सगळं.