काही महिन्यांपूर्वी 'काळोखाचा रंग कोणता' हे गाणं पहिल्यांदा ऐकलं. सुरुवातीला केवळ एक कलाकृती म्हणून ऐकलं, आवडलंही. पण मग जरा विस्मृतीत गेलं. गेल्या काही दिवसात मात्र पुन्हा काही कारणाने तेच शब्द ऐकावेसे वाटले आणि तेव्हा ते नव्याने भावलं. किती सुंदर आणि निर्मळ पद्धतीने त्या शब्दात मनाची एक अत्यंत अवघड अवस्था व्यक्त केलेली आहे. नेमकं सांगायचं तर डिप्रेशन, आणि त्या गर्तेत गेलेली व्यक्ती उभी राहिली डोळ्यासमोर.
जगातल्या दोन महासत्ता एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या आहेत. रणशिंग फुंकलं गेलंय. एक गोळी सुटण्याचा अवकाश. कुठल्याही क्षणी युद्धाला तोंड फुटेल. युद्ध नक्की कशासाठी? आजवर जगात विविध कारणांमुळे युद्धं झाली आहेत. पण कधी ऐकलंय दोन बलाढ्य राष्ट्रं लढाईसाठी सुसज्ज झालेली ती एका डुकरामुळे? हो! अमेरिकेच्या इतिहासात 'पिग वॉर' नावाने प्रसिद्ध असलेल्या या युद्धात अमेरिका व ग्रेट ब्रिटन या दोन बलाढ्य महासत्तांनी सान व्हान बेटांवर एका डुकरामुळे रणशिंग फुंकलं होतं.
बराच वेळ सलग रायडींग झाल्यावर राधाने मागेपुढे असलेल्यांना ब्रेक घ्यायची खूण केली. एक टपरीवजा दुकान होतं. सगळे थांबले. मस्त कडक चहा आणि मॅगी खाऊन पुढचा रस्ता सुरु झाला. अखेर संध्याकाळी ठरलेल्या ठिकाणी मुक्काम करायला सगळे थांबले. ते एक लहानसं खेडं होतं. ग्रुपचा मुक्काम तिथल्याच एका होमस्टे मध्ये होता. दिवसभराच्या रायडिंगमुळे सगळेच दमले होते. सर्वांनी फ्रेश होऊन जेवणावर ताव मारला. जेवण साधंच होतं पण ते दिवसभराच्या थकव्यानंतर निशाला खूप आवडलं. झोपण्यापूर्वी सगळ्यांना राधाने परत उद्याच्या सूचना दिल्या. निशाला झोप आली नव्हती.
शाळेच्या ग्रुपवर माझ्याच माहेरच्या कॉलनीत रहाणार्या मित्राने जेव्हा सांगितले की तू या वर्षी ५० वर्षांचा झालास, त्यानिमित्त मोठ्ठं सेलिब्रेशन असणार आहे, तेव्हा काय वाटलं कसं सांगू तुला? ५० नसले तरी २२-२३ वर्षे नक्कीच तुझ्या सान्निध्यात होते मी. तू यायचास तेव्हाचे १०-१२ दिवस म्हणजे मंतरलेले दिवस असत. अजुनही त्याचं गारुड आहे मनावर. लोक उन्हा-पावसाची तमा न बाळगता पायी चालत पंढरीला जातात, शिर्डी गाठतात. काय मिळतं त्यांना असा त्रास सोसून? माझ्या लेखी या प्रश्नांचं जे उत्तर तेच तुझ्यासमवेतचे दर वर्षीचे १०-१२ दिवस जगतानाचे उत्तर....निव्वळ आनंद.
या महिन्याचा साहित्य कट्ट्याचा विषय सगळ्यात अवघड विषय आहे...निदान माझ्या साठी तरी!
जेव्हा पहिल्यांदा ऐकलं की 'यावेळी स्वतः बद्दल लिहायचं आहे' तेव्हा वाटलं, " माझ्याबद्दल लिहायचं म्हणजे तर किती काही लिहिता येईल. कारण माझ्या इतकं मला कोणीच ओळखत नाही." पण जेव्हा त्या दृष्टीनी विचार करायला सुरुवात केली तेव्हा लक्षात आलं की हे प्रकरण वाटतं तेवढं सोपं नाहीये..
माझ्यातलं 'मी'पण शोधताना मला बरंच काही सापडतंय. माझ्या आत्तापर्यंतच्या पन्नास वर्षांत मी कशी घडत आणि काही वेळा बिघडत गेले याचा अभ्यास करताना किती तरी interesting गोष्टी लक्षात आल्या.
"टॉयलेट मध्ये गेलो, बघतो तर काय, कमोड शॉवर च्या नळावर सरडा!! थोडक्यात वाचलो."
या वाक्याला अपेक्षित 'हो का, अरे बापरे' न येता समोरचं नाक मुरडून समोरच्या कपाळावर आठी पडली.
"भलत्या शंका घेऊ नका.कमोड वर बसण्या आधीच दिसला सरडा, बाहेर आलो आणि दुसऱ्या खोलीच्या टॉयलेट मध्ये काम केले."
कपाळाच्या आठ्या विरून अपेक्षित 'अरे बापरे' आले.
"हे तर काहीच नै, त्या चीन का थायलंड मध्ये एकाच्या टॉयलेट मध्ये अजगर होता. चावला ना भलत्या जागी.टाके पडले."
सरड्या पासून बचावलेल्या वीराने मनात 'हिचं ऍनिमल प्लॅनेट बघणं कमी केलं पाहिजे.भलत्या वेळी भलत्या दचकवणार्या बातम्या बघत असते" अशी खूणगाठ बांधली.
प्रस्तावना
टिमवित असताना आमच्या विद्यार्थ्यांसाठी एक उपक्रम राबवण्यासाठी मी एक कल्पना मांडली होती. डिस्टन्स मोड शिक्षण असल्याने आमचे विद्यार्थी अगदी खेड्यापाड्यात पसरले होते. त्यामुळे त्या त्या गावांचा इतिहास लिहिला जाईल म्हणून "माझे गाव" ही कल्पना मी मांडली. काही कारणांनी ती तिथे प्रत्यक्षात आली नाही. पण ही कल्पना मनात ठाम रुजून राहिली.