“आज काय खास? इतकं तयार होऊन आलीयेस!” ठकूच्या कपड्यांकडे बघून सातासमुद्रापारच्या देशात कुणीतरी साडेसहाशेव्यांदा हा प्रश्न ठकूला विचारला. आपल्या मळखाऊ रंगाच्या, पिदडायच्या सलवार कुर्त्याकडे बघून ठकूला प्रश्नकर्त्याबद्दल साडेसहाशेव्यांदा सहानुभूती दाटून आली. सहाशेएकावन्नावी वेळ आलीच नाही. ठकूने रोजच्या वापरातून सलवार कुर्ते काढूनच टाकले. भारतात परत येताना ते सगळे ठकूने यमीपेक्षा पाचशेपट गोरी असलेल्या आपल्या मैत्रिणीला देऊन टाकले. मैत्रिणीने ते कौतुकाने मिरवत वापरले.
“ती हिंदी सिनेमातल्या दुखियारी माँ सारखे कपडे घातलेली रोमन बाई कोण गं ठकू? तिने साडीचा शोध लावलाय. हो ना?” गुगल संशोधकांनी ठकूला विचारले. “साडी म्हणजे काय वीज आहे का शोध लावायला?” ठकूने नाक उडवले.
“हल्लीच्या मुलींना फार झाकपाक करायला हवी. माझ्या खापर खापर पणजीच्या काळात नुसते उत्तरीय वापरायचे. आम्ही जेमतेम स्तनपट्टे वापरले. आता मुलींना चोळ्या हव्यात. नखरे नुसते!” मौर्य काळाच्या अखेरच्या पर्वात तरुण असलेली एक पणजीबाई तिच्या गुप्त काळातल्या खापर खापर नाती, पणत्यांबद्दल वैतागत होती.
(आयुष्यात अचानक आलेल्या वळणामुळे मैत्रीण वर यायला वेळच मिळत नाहिये. एका ग्रुपवर मैत्रिणींनी तू नक्की काय करतेस ते लिहून काढायला सांगितले. थोडक्यात लिहू म्हणत मोठाच लेख झाला. इथे प्रकाशित करतेय, म्हणजे इथल्या मैत्रिणींनाही कळेल.)
फूड स्टायलिंग प्रकाराशी ओळख भूषण (लेकाच्या मित्राचा बाबा) ने करून दिली. भूषण इनामदार हा पुण्यात बोटावर मोजण्याइतक्या फूड स्टायलिस्ट मधला एक होता. त्याची वेबसाईट http://www.bhushanfoodstyling.in/ जी आता आम्ही पुढे चालवतोय ती बघितली तर तो त्याच्या कामात किती अव्वल स्थानावर होता याची कल्पना येईल.
वेशभूषेचा इतिहास शिकताना समाज, राजकारण, अर्थशास्त्र, विज्ञान अश्या सर्व गोष्टींच्या इतिहासाला समजून घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही. थोडक्यात आपले कपडे हे आपल्या जगाची कहाणी सांगतात असं म्हणता येईल. हे सगळं कसं एकमेकांशी जोडलेलं असतं ते मला फार गमतीशीर आणि महत्वाचं वाटतं.
परवा, म्हणजे १३ फेब्रुवारीला एका पुस्तकाचं प्रकाशन झालं. आधीच पुस्तक म्हटलं की माझ्या आवडीचा विषय, त्यात ‘पुस्तकाचा विषय’ तर अति आवडीचा. बरोब्बर, मिलिंद सोमण!
काळाच्या एका टप्यावर निसर्गाने मानवामधे दोन मोठे बदल केले. आणि मानव इतर प्राण्यांहून वेगळा बनू लागला. एका बद्दल नेहमीच बोललं गेलं. दुसऱ्याचा मात्र अभावानेच उल्लेख झाला.
१. मानवाच्या मेंदूचा विकास झाला, त्याचे आकारमान वाढले. पर्यायाने त्याची बुद्धिमत्ता वाढली.
आणि
२. स्त्रीच्या प्रजनन काळाची सिमितता संपली. म्हणजेच विशिष्ठ काळातच तिची प्रजनन क्षमता असेल असे न रहाता ती कधीही प्रजनन करू शकेल अशी परिस्थिती निर्माण झाली.
या दोन्ही बदलांमुळे एका अर्थाने मानवी समुदाय, समाज निर्माण झाला असे म्हणावे लागेल.
आकाशात चंद्र उगवला होता. जरासे थंडच होते वातावरण. अनु सैरावैरा धावतच होता. तो थेट सूटबूट काकांच्या घरासमोर आला आणि त्याच्या पायालगतचे काल्पनिक ब्रेक दाबल्यासारखं करून तो थांबला.
त्यानं हळूच कानोसा घेतला. बाहेर कुणीच नव्हतं. आतून संथ स्वरातली धुन ऐकायला येत होती. तो आत जायचं की नाही या संभ्रमात असतांनाच त्याला काही आवाज ऐकायला आले. कुणीतरी बोलत होतं. पण नक्की काय ते कळत नव्हतं. मग दुसरा आवाज कानी पडला. तो ऐकताच अनु झटकन गेटच्या बाजूला झाला आणि भिंतीशी लपला.