अंदमान, पोर्ट ब्लेअर. नितांत सुंदर समुद्र किनारा लाभलेलं अंदमान. अनेक छोटीमोठी बेटं आणि त्यामानाने कमी वस्ती असल्याने इथला समुद्र अतिशय स्वच्छ आणि सुंदर आहे. पूर्वीचं का़ळ्या पाण्याच्या नावानं कुप्रसिद्ध असलेलं अंदमान आता पर्यटकांसाठी एक सुंदर ठिकाण ठरू शकतं. इथे येण्यासाठी चेन्नै वरून विमान सेवा आहे. चेन्नै वरून निघालं की दोन तासात पोर्टब्लेअर. नाहीतर चेन्नै, विशाखापट्टणम आणि कलकत्त्याहून बोटीनेही येता येतं. पण ३ ते ६ दिवस लागतात.
२०१४ च्या मार्च महिन्यात ८ दिवसांची पाँडीचेरी आणि अंदमानची सफर करून आले. एका फटक्यात दोन दोन केंद्रशासित प्रदेश बघून आले. अर्थात दक्षिणेकडे जाण्यासाठी हा काही फारसा सुखावह ऋतू नाही. नोव्हेंबर ते जानेवारी हा सर्वोत्तम काळ. पण उन्हाळा अगदीच सहन न करता येण्यासारखा नव्हता.
हा मणिरत्नमचा आवडता स्पॉट आहे म्हणे! त्याच्या बर्याच सिनेमात आहे हा. रा-वन मध्येही होता. त्या सिनेमाच्या शुटिंगच्या वेळी अभिषेक आणि ऐश्वर्या राहिले होते त्याच रुममध्ये आम्हीही म्हणजे अभिषेक अग्रवाल, ऐश्वर्या अग्रवाल ( :इश्श: ) राहिले. भरीला आमच्याबरोबर आराध्या अग्रवालही होती. ते हे - अथिरापल्लीचं रेन फॉरेस्ट रिझॉर्ट .
अथिरापल्ली हे फारसं माहित नसलेलं केरळमधिल ठिकाण. तिथे फक्त एकच गोष्ट बघण्याजोगी - अथिरापल्लीचा धबधबा! पण काय सांगू, हे रिझॉर्ट इतक्या मोक्याच्या जागी वसवलंय की दृष्ट काढून टाकावी.
'चांदोबा' मासिकातील चित्रे फारच भन्नाट असायची. एक अदभूत जग होतं ते. वेगळ्याच प्रकारचे पेहराव, दागिने, चेहर्याची ठेवण असलेली पात्रं त्या चित्रांतून दिसत. त्याचबरोबर देवादिकांनी घातलेले मोठ्ठे आणि विविध प्रकारचे फुलांचे हार असत. चित्रातल्या बायका भरपूर गजरे माळलेल्या दिसत. चांदोबातील या चित्रांवर दाक्षिणात्य ठसा होता.
तेच ते 'चांदोबा'तले हार माटुंग्याच्या बाजारात बघायला मिळतात. अतिशय आकर्षक आणि नक्षीदार रचना केलेले हे हार बघून त्या कलाकारांचं कौतुकच वाटतं. काही हार तर खास दाक्षिणात्य स्टाईलचे - हे भलेमोठ्ठे. माणसापेक्षाही जास्त उंचीचे.
मुलांचा अभ्यास म्हणजे घरात एक रणधुमाळीच असते. खरं तर अभ्यास फारसा नसतोच. पण जो आहे तो न करण्याकरीता हजारो कारणे पुढे येत रहातात. 'अभ्यास न करण्याची १०१ कारणे' तत्सम काहीतरी पुस्तक नक्की काढू शकतील दोघं मिळून.
पहिले तर होमवर्क लिहीलेलं पानच घरी पोहोचत नाही. बरं कुठे गेलं विचारावं तर शाळेत नक्की बॅगमध्ये टाकलेलं त्यांना आठवत असतं. शाळा ते घर ती बॅग उघडलेली पण नसते पण काहीतरी चमत्कार होऊन ते पान गायब झालेलं असतं खरं...त्यांचा दोष नसतो त्यात.
कोणी आपल्याला विचारले कि तुझी आवडती जागा कोणती, तर आपण जे पटकन नाव देतो, तिथे काही खास आहे म्हणून नाही तर आपल्या सगळ्या आठवणी तिथेच अडकलेल्या असतात म्हणून. आपण त्या आठवणींना त्या जागे पेक्षाही जास्त महत्व देतो. जसे जसे आपण मोठे होतो तश्या त्या जागाही बदलत राहतात.
हीच गोष्ट शाळेची, कॉलेजची. आपल्याला आपलीच शाळा/ कॉलेज नेहमी दि 'बेष्ट' :cool: वाटते. ह्या आठवणींबद्दल आपण भरभरून बोलतो.
पण आज फक्त शाळा किवा कॉलेज पुरतं शिक्षण मर्यादित नाहीये. आजच्या विद्यार्थ्यासमोर पूर्ण जग आहे आणि इंटरनेटमुळे ते अजूनच जवळ आले आहे.
"I want to have a family meeting today!" अरीनशेटांनी मागणी केली.
कुठेतरी आयत्या वेळी जायचं ठरल्याने त्यांच्या स्क्रीन टाईम वर बाधा आलेली त्यामुळे एक तातडीची family meeting हवी – या प्रकरणाचा छडा लावण्याकरीता – अशी त्याची मागणी होती.
तशी रविवारची संध्याकाळ आमची कौटुंबिक मिटींगची वेळ. समस्त ईन-मीन-तीन-चार कुटंबिय जेवणाच्या टेबलाशी जमून एक-मेकांच्या officially उखाळ्या-पाखाळ्या काढायची हीच ती सुवर्णसंधी. एरवी काढतो त्या unofficially!
सद्ध्या नॉस्टॅल्जिक होण्याचे दिवस आहेत बहुधा! मायबोलीवर फिरताना, आठवणीतले स्वर आणि सुगंध हा बुलेटीन बोर्ड दिसला.. आणि इतके वास आणि स्वर गर्दी करून दाटले!!
सुगंध आणि आठवणींचे खरंच काहीतरी नातं आहे .. मागच्याच पोस्ट मधे मी ओल्या मातीच्या वासाने वेडी होऊन काहीबाही खरडले होते.. आता तोच वेडेपणा पुढे कंटीन्यु करते..
(मुकुल शिवपुत्र यांची "तारुवा गिनत गिनत"ही चिज एेकताना जे वाटत गेलं ते असं...)
आणि ती ही रात्र आठवते सख्या...
तुझा निरोप आला अन सारी दुपार संध्याकाळची वाट बघण्यात गेली. तू येणार...काय करू, काय नकोहोऊन गेलं.तुझ्या येण्याला साजरं करण्यासाठी किती सोसा सोसाने सारे सजवले, सजले... सजणेच जणु साजण होऊन आले!