झाले असे कि मला आईने ह्या दोन बरण्या घेऊन दिल्या होत्या..आहेत साध्याशाच पण आईने दिलेली गोष्ट पटकन टाकायचे जीवावर येते...वापरून त्याची प्रेसची झाकण खराब झालेली..
तेव्हा आसे काहीतरी करून बघावे असे डोक्यात आले
(हा लेख मायबोलीवर जेरेमीच्या मृत्यूदिनी प्रकाशित केला होता.यात आता काही डिटेल्स अजून टाकले आहेत.या माणसाबद्दल जितकी माहिती मिळवतेय तितका तो मला जास्त आवडतोय.)
१२ सप्टेंबर.उंचपुऱ्या देखण्या जेरेमी ब्रेट ला जगातून गेल्याला २१ वर्षं होतील.अजूनही जुने बी.आर.चोप्रा महाभारत पाहिलेल्यांच्या डोळ्यासमोर कृष्णाचं नाव काढलं की फक्त नितीश भारद्वाज येतो तसं शेरलॉक होम्स म्हटलं की जगातल्या बहुतांश लोकांच्या डोळ्यासमोर फक्त आणि फक्त जेरेमी ब्रेट येतो.
||वळण||
हां इथेच असायला हवं
जरा पुढे जावून बघुया
अरे हेच की ते वळण
ओलांडल की सापडेलच!
दिसेल तुला
तुझं नी माझं
अरे काय म्हणून काय विचारतोएस?
काहिही सापडेल
काहिही दिसेल
काहिही असेल
पण जे असेल ते फक्त
तुझं नी माझं असेल
चित्र दिसेल कदाचित्
तुझ्या माझ्या मिठिच्या
गहिऱ्या रंगात रंगलेलं!
किंवा गाणं ऐकू येईल
तुझ्या माझ्या विरहाच्या
आर्त सुरात भिजलेलं!
आपल घरही असेल तिथेच
आठवणिंची एक एक वीट
ठेवून रचलेलं.
पाऊस भेटेल तिथेच
धो धो कोसळणारा
तुला मला अज्जीब्बात न भिजवणारा
पण आडोशाला एकमेकांजवळ ढकलणारा
तू ये तर खरं
शोध ना जरा
मी फिरतीये तिथेच गोल गोल
आपली भांडणं
मुलींनो, पुढच्या महिन्यात काही निमित्ताने सिंगापूरला जाणार आहोत. तिथून पुढे बँकाँकला जायचा प्लॅन आहे. तर तिथे रहात असणार्या, राहून आलेल्या, फिरुन आलेल्या मैतरणींनो, मला सांगा चुकवू नये असे आणि चुकवावे असेही :P जे काय असेल ते. खाणे-पिणे, फिरणे, शॉपिंग सगळ्याबद्द्ल...
वेणूला मी कांदेपोह्यांबद्दल सांगितलं होतं ते काही खोटं नव्हतं. एव्हाना मी नोकरीत सेटल झाले होते, कमावती होते. आई-वडिलांनी मला विचारलं की आता स्थळं बघायची का, का कोणी शोधला आहेस? कोणी शोधलेला नव्हता, आणि लग्न करायचं होतं (म्हणण्यापेक्षा, लग्न न करायचं काही कारण नव्हतं) म्हणून त्यांना होकार दिला. तेही दोन-चार वधू-वर सूचक केंद्रांमध्ये ताबडतोब नाव नोंदवून आले. त्यानंतर मग जे काही सुरू झालं त्यासाठी मात्र मी मानसिकरित्या मुळीच तयार नव्हते. पार्ल्यातलं एकटेपण त्यापेक्षा निश्चितच सुसह्य होतं. असो.
प्रेम असतच रे तुझ्या माझ्या मनात
खुंटीवर टांगलेल्या कपड्यां सारखं!
किंवा कोपऱ्यात पडलेल्या रद्दी सारखं...
फार फार तर
To-Do list मधल्या शेवटल्या task सारखं
जरा मळलं म्हणून काय झालं
प्रेम तर आहे ना!
जरा धूळ बसली म्हणून काय झालं
प्रेम तर आहे ना!
जरा मागे पडल म्हणून काय झालं
प्रेम तर आहे ना!
उधळून टाकावं मनातलं प्रेम...
वाढत म्हणे!
साचून राहीलं तर नितळ
पाणीही गढूळतच ना!
झटकूया का थोडी धुळ?
करुया का कोपरे लख्ख?
देउया का प्रेमाला Prior and Urgent चा कप्पा?
चला, इथे कवितांवरील झब्बूंची मैफल जमवुयात :)
कधी स्वतंत्र कविता टाकावी वाटली तर स्वतंत्र धागा काढूनही टाका आणि इथे लिंक द्या. किंवा फक्त इथेच टाकावी वाटली तरी तसही चालेल.
सांग सख्या रे हे;
असे काय व्हावे?
तू दूर तरिही;
तुझे भास व्हावे!
जरी दर्पणी ह्या;
मला मी बघावे
तुझे रुप त्याने;
हाय दाखवावे!
श्वासही माझे;
तुला फितूर व्हावे?
कसे भान नुरले,
मला ना कळावे
सांग सख्या रे हे;
असे काय व्हावे?
कळीने जसे त्या,
उमलुन यावे
तसे मी फुलावे,
बहरुन जावे
अशी काय जादु?
असे काय व्हावे?
तीर नाही तरी मी,
घायाळ व्हावे
सांग सख्या रे हे;
असे काय व्हावे?
सरींनी स्वरांच्या
मन चिंब व्हावे
तू सूर अन मी
तुझी वेणु व्हावे
तुझे श्वास, निश्वास
मी ओळखावे
सांग सख्या रे हे;
असे काय व्हावे?
आम्ही मैत्रिणींनी ठरवले चला ट्रेकिंगला जाऊ, फिरण्याची आवड असल्यामुळे मी सुद्धा उत्साहाने तयार झाली. जसा ट्रेकिंगचा दिवस जवळ येत होता मज्जा वाटत होती, नेहमीच्या सवयीप्रमाणे खरेदी जोमात चालू होती, माझ्यासोबत माझी आत्येबहीण मधु पण येणार होती, मग काय स्पोर्ट्स शूज, टी-शर्ट, ट्रॅकपँट, बॅग सर्वकाही सज्ज..
माझे आई-पप्पा गणपती, महालक्ष्मी व्यवस्थित पार पाडून, सगळ्यांच्या भेटी घेऊन, मुंबईला ताईकडे २ दिवसाचा मुक्काम करून शुक्रवारी रात्री १६ सप्टेंबरला सुखरूप लंडनला पोहोचले. बरोबर माझा काका पण आला होता कारण त्याला पुढे अमेरीकेला जायचे होते त्याच्या मुलांकडे.. म्हणुन आम्ही त्याला लंडनला ब्रेक जर्नी करून पुढे जा, असा हट्ट केला होता.. त्या निमिताने त्याला माझ्याकडे राहता येईल, लंडन पाहता येईल, असा प्लानच होता.
हा प्लान तर व्यवस्थित आणि सुखासु़खी झाला.. पण पुढे नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. जिथे आमचं काहीच चाललं नाही..
मराठी माणसाची साधारण प्रवृत्ती ही आपल्या पंचक्रोशीत रमण्याची. पण दोन पिढ्यांमागे भाकरीच्या शोधात मूळ गाव सोडून शहराकडे धाव घेणे, हे अपरिहार्य झाले. तरीही बहुधा परीघ मुंबई-पुण्यापर्यंतच राहिला. त्या काळात श्री. फिरोज म्हणजेच पंढरीनाथ रानडे दिल्ली, कलकत्ता, शिलॉंग अश्या सुदूर ठिकाणी कामानिमित्त्य राहिले. तिथल्या अनुभवांनी त्यांचे विश्व विस्तारले गेले. त्यांच्या पत्नी प्रतिभा रानडे ह्यांनी व स्वतः रानडे ह्यांनी त्या अनुभवांवर लेखन केले. श्री. रानडे ह्यांच्या ‘काबूलनामा’ ह्या पुस्तकाविषयी माझे चार शब्द....
लग्नात खूप भेटवस्तू मिळतात... काही संसाराला उपयोगी... काही सजावटी साठी आणि बऱ्याचश्या नटण्या मुरडण्या साठी ....
पण काही भेटी इतक्या अमूल्य असतात की त्या तुम्हाला आयुष्यभर सोबत करतात.... इतक्या अमूल्य असतात की तुमची हरवलेली ओळख समोर आणून ठेवतात....
माझ्या लग्नात बाबांनी ठरवल होत काही देणी घेणी नाही करायची. आहेर घ्यायचा नाही . फक्त एकच अपवाद ठेवला.... स्वत:हून...
"मिलींद दादा कडून त्याच सगळं शास्त्रीय / उपशास्त्रीय संगीताच collection घ्यायच ! "
मूक्त गाउन
जगा भांडून
जेंव्हा येईन मी घरी
थोडी त्रासून
दे मीठिचा उबारा
दोन्ही हात पसरुन...
लाज सोडून
भिती तोडून
जेव्हा लागेल ही ओढ
वाट पाहूनं
घे ओढून तू मला
ओठी ओठ मिसळून...
तुझे तापलेले श्वास
मला पूर्णत्वाचा ध्यास
गेले देह सुगंधून
जाऊ काळाच्या पल्ल्याड
सारी माया ओलांडून!
........
कविन ची मौन
आणि अवल ची अबोलीचे वन ला
माझा झब्बू!!!