[सोसायटीच्या नाटकांच्या स्पर्धेसाठी स्क्रिप्ट निवड करण्यासाठी जमलेली मुले]
[सोसायटीचं आवार...मुलं घोळका करुन काहीतरी डिस्कस करतायत. बरेच हातवारे...मतभेद वगैरे व्यक्त करुन झाल्यावर शेवटी मेजॊरिटी विन्स म्हणत निर्णय घेऊन रुद्रच्या बाबांकडे मदत मागायला रवाना होतात]
(रुद्रचे बाबा शिक्षक + लेखक आहेत)
(मुलं रुद्रच्या दारावरची वेल वाजवतात..रुद्रचे बाबा दार उघडतात..मुलं आत येतात)
रुद्रचे बाबा: आज काय सगळ्या मुलांचा मोर्चा माझ्या घरावर का?
रुद्र: मोर्चा काय रे बाबा! आम्ही तुझी मदत मागायला आलोय
बाबा: काय? कांदाभजी की वडपाव? कसली पार्टी उकळायचा बेत आहे आज?
आपलाचि संवादु आपणासि असंच हे सगळं लिखाण. कधी आयुष्याकडे वळून बघेन,,कधी मनात डोकावेन, कधी विचारांना तपासून बघेन, जसं जमेल तसं स्वत: लाच शोधत जाईन. आता हे इथे का लिहिणार? तर कधी कधी काही पोस्ट वाचताना जाणवतं, की इथूनच मी जात होते, गेले होते, धडपडले होते, तेव्हा कोणी हात दिला, नाही दिला, कधी माझी मीच शोधत, सापडवत, तयार करत गेले होते. ते सगळं वाचताना एखादीला जरी एक वाक्य उपयोगी पडलं तरी? पडेलच उपयोगी असही नाही, पण वाचायला आवडलं तर, म्हणून इथे लिहितेय.
अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. या माणसाला जिवंत ठेवतात. पण या गरजांबरोबरच स्वातंत्र ही एक अशी गोष्ट आहे जी माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवते. काय खायचं, घालायचं, वाचायचं, शिकायचं या आणि अशा अनेक प्रकारच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याबरोबरच, समुहात कसं वागायचं, कुठे जायचं, कधी आणि कसं भेटायचं अशा सामजिक स्वातंत्र्यावर गदा आली की माणूस, समाज अस्वस्थ होतो, त्यातून सुटायची धडपड करायला लागतो हे इतिहासाने आपल्याला वेळोवेळी दाखवले आहे. बळी तो कान पिळी आणि सत्तापिपासू प्रवृत्ती यामुळे मानवजातीचा इतिहास सत्तासंघर्ष आणि प्रजेवर अत्याचार याने भरलेला आहे.
कोणाला ढोकळा कसा जमतो त्यानुसार एक एक शब्द निवडा टायटलमधून. :)
पाककृती १ : माधुरी
१.५ कप चना डाळ, १ कप उडद डाळ, १ कप मुगडाळ, १ कप तांदूळ धुवून, ५-६ तास किंवा रात्रभर भिजवून, वाटून आणि मग फर्मंट करून छान हलके जाळीदार
ढोकळे होतात. करतांना त्या बॅटर मध्ये मी हि मी, आलं लसूण पेस्ट पण घालते आणि वरून जिरं-मोहरी-हि मी-कडिपत्ता-तीळ ची फोडणी.
छान फर्मंट झालं की दही किंवा इनो घालायची गरज नाही. पण थंडी मध्ये जर नीट फुलून नाही आलं तरच मी थोडं इनो घालते.
बरीच भटकंती वाचली पण मला हवी असलेली माहीती मिळाली नाही, म्हणुन हा नवा धागा.
आम्ही दोघे व अजुन ४ सिनीअर सिटीझन्स मिळुन वैष्णोदेवी दर्शनाचा प्लान करत आहोत. एप्रिल मधे पहिल्या आठवड्यात जाणार आहोत. राहण्याची काही बुकिंग्स श्राईन बोर्ड च्या साईट वर केली, पण २ दिवस पटनी टॉप ला ही रहाण्याचा विचार आहे. ऑनलाईन बुकिग्स साठी हॉटेल च्या साईटस पाहिल्या, पण मागे एक्दा काल्का च्या हॉटेल चा अनुभव भयंकर आहे, साईट वर वेगळे आणि प्रत्यक्षात वेगळे असला प्रकार होता, ३ स्टार असुनही. त्यामुळे लगेच बुकिंग करायला धजावत नाहीये.
कोणाच्या माहीतीत एखदे चांगले हॉटेल आहे का?
महाराष्ट्र म्हटले कि मराठी माणूस... आणि मराठी माणूस म्हटले कि छत्रपती शिवाजी महाराज...... त्यांनी आणि त्यांच्या शूर मावळ्यांनी ३५० वर्षांपूर्वी केलेले कर्तृत्व आपल्या सर्वांनाच माहितीच आहे.... अगदी लहान असल्यापासून आपण इतिहासात वाचत आलो आहोत... ते अगदी जीव जोखिमेत घालून हिंदवी स्वराज्य स्थापनेपर्यंत.... मला काही फारसे इतिहास सांगायचं नाही आता, महाराजांनी जिंकलेले, घडवलेले किल्ले, गड़ सिंधुदुर्ग, रायगड, प्रतापगड, जंजिरा आणि खूप काही, आता आपल्यासाठी पिकनिक स्पॉट झाले आहेत....
मैदा ३ वाट्या
मीठ दिड वाट्या
पाणी ३ वाट्या
तेल ३ टिस्पून
लिंबू सत्व १ टेबलस्पून
खाद्य रंग.
कृती:
पाणी, लिंबूसत्व आणि तेल एकत्र गरम करून घ्यावे.
तोवर मीठ व मैदा व्यवस्थित एकत्र करून घ्यावे.
तीन मोठ्या वाट्यांमधे ( बोलमधे) वेगवेगळा खाद्य रंग घ्यावा (आपल्या अंदाजाने). प्रत्येकी एक एक वाटी उकळलेले पाणी त्यात टाकावे व रंग पाण्यात व्यवस्थित मिसळून घ्यावा.
प्रत्येक बोल मधे दिड वाटी मैदा-मिठाचे मिश्रण टाकावे. चमच्याने ढवळून एकत्र करावे.
सुरवातीला हे ढवळलेले मिश्रण जरा पातळ वाटू शकते. अज्जाबात घाबरायचे नाही.. मिनिटभरात ते घट्ट होऊ लागते.
चला चला राणीच्या राज्यातल्या मैत्रिणींनो आत्ता आपण भेटलेच पाहिजे अशी माधुरीची हाक आली आम्हांला,मग काय विचारता.. थंडी, वारा, पाऊस या सगळ्याचा विचार करत करत आम्ही समस्त युकेवासी मैत्रिणी "हो हो भेटायचेच" असा निश्चय करून तयारीला लागलो. :hhh: भावनाने लगेच ४ फेब्रुवारीचा मुहूर्त ठरवून टाकला. मग आमची चर्चा कोण कोण येणार, कोण काय खाणार, कोण नक्की किती लेअर्स घालणार अशा अनेक वळणांचा प्रवास करू लागली. दिवस ठरला, सगळ्या तयार झाल्या आणि मग चर्चेने एकदम मध्ये अल्पविराम, स्वल्पविराम मोड ऑन केला.
काही व्यक्ती जन्माला आल्यापासूनच कलेच्या सानिध्यात वाढतात आणि त्या कला त्यांच्या संस्काराचा एक भाग बनून त्यांचे जीवन कलात्मक बनवतात. थोडक्यात आईवडिलांच्या किंवा जवळील व्यक्तींच्या कलेचा वारसा ह्या व्यक्तींना मिळालेला असतो. मग ही कला आधुनिक युगात नवीन नवीन कल्पनांद्वारे दोन पावले पुढे बहरत जाते. शिवाय ह्या कला जोपासताना अजून अनेक जोडकला हौशीने अंगिकारल्या जातात. पुण्याच्या सौ. आरती खोपकर ह्यांच्यातही अशाच काही कलांचा संगम आहे आज त्यांची आपण ओळख करून घेऊ.
परवा एका दुकानात पुस्तके चाळता चाळता एक वेगळेच उठून दिसणारे कव्हर दिसले म्हणून पटकन उचलले. एक रिकामी अनंत विश्वाची चौकट - काळ आणि रक्ताला झाकून टाकणारी.. रिकामा आणि खुणावणारा काळा कॅनव्हास. उत्सुकतेने चाळले तर चक्क कला, राजकारण आणि इतर समकालीन गोष्टींची बांधलेली मोटच सापडली.. आपल्याकडे कलेवर लिहिणारे लेखक फार कमी, त्यातही जुन्या चित्रकारांची मीठमसाला लावलेली आत्मचरित्रच मिळण्याची शक्यता जास्त!
आहा!! काय सुंदर ओळ
कसं ग बाई गोड ते!
ओहो ओहो ,
अहो थांबा थांबाच
अं?
काय झाल?
च्च!!! मीटर बघा की
असं काय!! हो की,
निट उमटू तरी दे मला मनात तुझ्या
मला काय म्हणायचं आहे ते तरी ऐक ना, प्लीज
छे छे अजिबातच नाही
म्हणजे नाहीच
हे बघ मला वृत्त सांभाळायला हवं आहे.
तू नकोस
उपटली ओळ
कम्प्लीट बॅकस्पेस
विंडोच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत.
...
तर मी काय म्हणत होते आम्ही ना थेट स्क्रीनवरच लिहितो आजकाल ,
हे स्क्रीनवर लिहिण फार सोप्प असतंय बघा, कागदावर कशी खाडाखोड स्पष्ट दिसते कागद नष्ट करेपर्यंत.
आत्ता मैत्रीणीवर आले तेव्हा श्यामलीचा बुकमार्क हा धागा दिसला...
मी म्हटलं अरे चला आणखी कुणी बनवले ते बघुया..पण ती हस्तकला नव्हती हे नंतर कळलं :ड सुंदर लिहिलयसं श्यामली..
तर माझ्या रिकाम्यापणाचे, कंटाळा आले कि करायच्या उद्योगातला हा प्रकार इथे देतेय.. इथ बरीच वाचक मंडळी दिसतेय त्यांना कदाचित भावेल..
तर I am a book dragon (not a book worm..but a dragon). या छंदासोबत स्वतःच्या पुस्तकाविषयीचा पझेसिव्हनेस माझ्याबरोबर इतरांना सुद्धा खाऊन टाकतो.
हातातल्या पुस्तकातली कथा रंगत चाललेली असताना लक्षात येतं ,
अर्ध्याच्यावर पुस्तक वाचून झालंय...
अरेच्चा शेवट जवळ आला की कथेचा.
च्च!! एवढ्यात नको ना शेवट व्हायला,
अजून जरा जास्ती असतं तर आवडेल वाचायला.
केवढी रंगलीये कथा!
त्यातली पात्र पण अगदी आपल्या मनासारखी वागतायत.
पुढचं पान उलटल..
हे काय अचानक वेगळ्च वळण घेतलं कथेनी?
हे अस नको ना व्हायला.
एवढी का गुंतत चालल्ये या सगळ्यामध्ये?
एक क्षुल्लक कथाच
ती काय वाचायची आणि सोडून द्यायची
पण असलं काहीतरीच का व्हायला लागलय?
पुस्तकात बुक-मार्क घालून ठेऊनच देऊया झालं...
कथेचा शेवट नकोच व्हायला.
मागील आठवड्यात उरण पाणजे येथील खाडीवर जाण्याचा योग आला. खर तर आमची जाण्याची वेळ संध्याकाळची असल्याने थोडक्यातच समाधान मानून यावे लागले कारण सूर्यनारायण मावळतीला निघाले होते. पण जो वेळ तिथे घालवला तो पक्षी दर्शनाने सार्थक झाला ह्याचे मनोमन समाधान लाभले.
फाईट म्हणजे एक पर्व असत... फाईट डीक्लेयर झाली कि मुलांची वजन तपासा मग वेट गृप पहा ... बोर्डर लाईनला असली मुल तर त्यांना आधीच्या वेट गृपमध्ये आणायचा प्रयत्न करा...पण उपासमार बिलकूल नाही... अटलिस्ट वजन वाढणार नाही याकडे लक्ष ठेवा. आम्ही कायमच वजनामुळे आमच्यापेक्षा बऱ्याच मोठ्या मुलीच्या समोर येतो.
तुमचे आवडते रोमँटीक, फिल गुड, chick-flick, mushy इत्यादी चित्रपटांची यादी द्या! मला असले मुव्हीज लावून दोन तास डोकं बाजूला ठेवायला फार आवडते. तुमच्या लिस्टीतून काही न पाहिलेले मिळतील..
माझे काही आवडते.
१) नॉटींग हिल
२) मेड इन मॅनहॅटन
३) शॅल वी डान्स?
४) स्लीपलेस इन सिअॅटल
५) यु हॅव्ह गॉट मेल
६) द वेडींग डेट
७) रहना है तेरे दिल मे
मातोश्रींच्या डोक्यात अचानक र्मदा परिक्रमा करायचे आले आहे. तिला मनापासून फिरायला आवडते. एकटीच असल्याने कोणी चांगली कंपनी मिळाली की तिचे बेत आखणे सुरू होते. अजून छान चालते फिरते आहोत तो पर्यंत भारत फिरणे ही इच्छा! परवा एका नर्मदा परिक्रमेचे पत्रक मला पाठवून याला मी जाऊ का अशी विचारणा झाली आहे. मी ते पत्रक बघितले तर मला काही गोष्टी खटकल्या म्हणून तिला मी थोडी माहिती काढते असे सांगून थोपवले आहे. तर मला थोडी माहिती हवी आहे.