प्रेम असतच रे तुझ्या माझ्या मनात
खुंटीवर टांगलेल्या कपड्यां सारखं!
किंवा कोपऱ्यात पडलेल्या रद्दी सारखं...
फार फार तर
To-Do list मधल्या शेवटल्या task सारखं
जरा मळलं म्हणून काय झालं
प्रेम तर आहे ना!
जरा धूळ बसली म्हणून काय झालं
प्रेम तर आहे ना!
जरा मागे पडल म्हणून काय झालं
प्रेम तर आहे ना!
उधळून टाकावं मनातलं प्रेम...
वाढत म्हणे!
साचून राहीलं तर नितळ
पाणीही गढूळतच ना!
झटकूया का थोडी धुळ?
करुया का कोपरे लख्ख?
देउया का प्रेमाला Prior and Urgent चा कप्पा?
चला, इथे कवितांवरील झब्बूंची मैफल जमवुयात :)
कधी स्वतंत्र कविता टाकावी वाटली तर स्वतंत्र धागा काढूनही टाका आणि इथे लिंक द्या. किंवा फक्त इथेच टाकावी वाटली तरी तसही चालेल.
सांग सख्या रे हे;
असे काय व्हावे?
तू दूर तरिही;
तुझे भास व्हावे!
जरी दर्पणी ह्या;
मला मी बघावे
तुझे रुप त्याने;
हाय दाखवावे!
श्वासही माझे;
तुला फितूर व्हावे?
कसे भान नुरले,
मला ना कळावे
सांग सख्या रे हे;
असे काय व्हावे?
कळीने जसे त्या,
उमलुन यावे
तसे मी फुलावे,
बहरुन जावे
अशी काय जादु?
असे काय व्हावे?
तीर नाही तरी मी,
घायाळ व्हावे
सांग सख्या रे हे;
असे काय व्हावे?
सरींनी स्वरांच्या
मन चिंब व्हावे
तू सूर अन मी
तुझी वेणु व्हावे
तुझे श्वास, निश्वास
मी ओळखावे
सांग सख्या रे हे;
असे काय व्हावे?
आम्ही मैत्रिणींनी ठरवले चला ट्रेकिंगला जाऊ, फिरण्याची आवड असल्यामुळे मी सुद्धा उत्साहाने तयार झाली. जसा ट्रेकिंगचा दिवस जवळ येत होता मज्जा वाटत होती, नेहमीच्या सवयीप्रमाणे खरेदी जोमात चालू होती, माझ्यासोबत माझी आत्येबहीण मधु पण येणार होती, मग काय स्पोर्ट्स शूज, टी-शर्ट, ट्रॅकपँट, बॅग सर्वकाही सज्ज..
माझे आई-पप्पा गणपती, महालक्ष्मी व्यवस्थित पार पाडून, सगळ्यांच्या भेटी घेऊन, मुंबईला ताईकडे २ दिवसाचा मुक्काम करून शुक्रवारी रात्री १६ सप्टेंबरला सुखरूप लंडनला पोहोचले. बरोबर माझा काका पण आला होता कारण त्याला पुढे अमेरीकेला जायचे होते त्याच्या मुलांकडे.. म्हणुन आम्ही त्याला लंडनला ब्रेक जर्नी करून पुढे जा, असा हट्ट केला होता.. त्या निमिताने त्याला माझ्याकडे राहता येईल, लंडन पाहता येईल, असा प्लानच होता.
हा प्लान तर व्यवस्थित आणि सुखासु़खी झाला.. पण पुढे नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. जिथे आमचं काहीच चाललं नाही..
मराठी माणसाची साधारण प्रवृत्ती ही आपल्या पंचक्रोशीत रमण्याची. पण दोन पिढ्यांमागे भाकरीच्या शोधात मूळ गाव सोडून शहराकडे धाव घेणे, हे अपरिहार्य झाले. तरीही बहुधा परीघ मुंबई-पुण्यापर्यंतच राहिला. त्या काळात श्री. फिरोज म्हणजेच पंढरीनाथ रानडे दिल्ली, कलकत्ता, शिलॉंग अश्या सुदूर ठिकाणी कामानिमित्त्य राहिले. तिथल्या अनुभवांनी त्यांचे विश्व विस्तारले गेले. त्यांच्या पत्नी प्रतिभा रानडे ह्यांनी व स्वतः रानडे ह्यांनी त्या अनुभवांवर लेखन केले. श्री. रानडे ह्यांच्या ‘काबूलनामा’ ह्या पुस्तकाविषयी माझे चार शब्द....
लग्नात खूप भेटवस्तू मिळतात... काही संसाराला उपयोगी... काही सजावटी साठी आणि बऱ्याचश्या नटण्या मुरडण्या साठी ....
पण काही भेटी इतक्या अमूल्य असतात की त्या तुम्हाला आयुष्यभर सोबत करतात.... इतक्या अमूल्य असतात की तुमची हरवलेली ओळख समोर आणून ठेवतात....
माझ्या लग्नात बाबांनी ठरवल होत काही देणी घेणी नाही करायची. आहेर घ्यायचा नाही . फक्त एकच अपवाद ठेवला.... स्वत:हून...
"मिलींद दादा कडून त्याच सगळं शास्त्रीय / उपशास्त्रीय संगीताच collection घ्यायच ! "
मूक्त गाउन
जगा भांडून
जेंव्हा येईन मी घरी
थोडी त्रासून
दे मीठिचा उबारा
दोन्ही हात पसरुन...
लाज सोडून
भिती तोडून
जेव्हा लागेल ही ओढ
वाट पाहूनं
घे ओढून तू मला
ओठी ओठ मिसळून...
तुझे तापलेले श्वास
मला पूर्णत्वाचा ध्यास
गेले देह सुगंधून
जाऊ काळाच्या पल्ल्याड
सारी माया ओलांडून!
........
कविन ची मौन
आणि अवल ची अबोलीचे वन ला
माझा झब्बू!!!
Location:
स्नेह पार्क च्या 1bhk flat.ची bedroom
Property:
जूनं godrejच लोखंडी कपाट... त्यावर उंच ठेवलेला National Panasonic चा टेप रेकॉर्डर... त्यात असलेली आशा भोसलची "नक्षत्रांचे देणे" casset ...
पात्र:
मी (साधारण 5व्या इयत्तेत) पियूष (3 वर्षाने लहान भाऊ) आणि बाबा
आई स्वयपाक घरात (पोळ्या लाटण्यात busy)
::::
रात्रीचे 8 वाजले असतात...
पियूष कपाटा समोर stool ठेवून उभा...
बाबा harmonium घेऊन सज्ज...
रेकॉर्ड वर गाणं सुरु करायला सांगतात....
Stool वर उभा राहुनही पियूषचा जेमतेम play button पर्यन्त हात पोचतो...
आणि गाणं सुरु होतं....
चांदण्यात फिरताना.............
अस काय होत तुझ्या माझ्यात?
कधी कोणता आव नाही
कधी ओढा ताण नाही
कसं अलगद जपलेलं
कातर हळवं नितळ स्वच्छ नातं.
इतक नकळत जपलेलं की
काय जपतोय हे ही न कळावं?
इतक घट्ट सामावलेलं
की तुझं दूर असणंही न जाणवावं!
आणि मग झालीच आपली भेट
तू होतासच माझ्यात
अन् मी ही तुझ्यात
न भेटता न बोलता सामावलेलं
अस्तीत्व आपलं एकमेकांत
ती आपली भेट
देऊन गेली भेट
तुझी मला नि माझी तुला!
***मोगऱ्याचा गजरा***
तिला मोगऱ्याचा गजरा खूप आवडायचा ...
केसात माळला नाही तरी गाडीत, पर्समध्ये कुठे ना कुठे गजरा दरवळतच असायचा कायम ...तिच्या अवती भोवती...
आज तर काय डोहाळ जेवण होत तिचं ...
वेणी लगडली होतीच मोगऱ्याने... पण तिला आवडतो मोगरा म्हणून पूर्ण वाडीच मोगऱ्याची मागवली होती... खास तिच्यासाठी!
आज्जी कौतुकाने म्हणाली...
"घे हो माळून मोगरा... पुन्हा लेकरु अंगावर पित राहील तोवर वासही घेता नाही येणार फुलांचा."
आज्जीचं आपलं काही तरीच... ती मनात पुटपूटली...
"असं काही नसतं ग आज्जी" , म्हणायचं होतं तिला, पण हातात मोगरा गोवता-गोवता विसरलीच ती... ...
शाळेत भारताचा इतिहास शिकलो पण उत्तर पूर्व राज्यांचा इतिहास, तिथले राजे ह्याबद्दल शिकल्याचं काही आठवत नाही. आसामच्या इतिहासाबद्दलची माहिती साधारण इ.स. चवथ्या शतकानंतरची उपलब्ध आहे. आसाममध्येही भारतातील इतर राज्याप्रमाणे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष राज्यकर्त्या व योध्या अनेक स्त्रिया होऊन गेल्या पण त्यांच्याबद्दल फारशी माहिती आढळत नाही. अश्याच एका अपघाताने, बदलेच्या भावनेने बनलेल्या लढवैय्या स्त्रीची कहाणी.
नवरात्र चालू आहे आणि लवकरच दिवाळी सुद्धा येईल. खरेदी चालू झाली असेल ना? साड्यांवर मॅचिंग दागिने नकोत का मग? बघा बरं आवडताहेत का? कोणाला हवे असतील तर सांगा. वेगळे कलर सुद्धा मिळतील. आत्ता जे तयार आहेत ते इथे अपलोड केलेत. जसजसे बनवेन तसे इथे अपडेट करेन.
फेसबुकवरील एका मैत्रीणीने विमान उतरताना मुंबई कशी निळी दिसते असा एक फोटो टाकला होता. ही निळाई होती टर्पोलिनच्या शीट्सने आच्छादलेल्या झोपडपट्टीची!
माझा रोजचा जा-ये करण्याचा नवा बदललेला रस्ता पहिल्या दिवशी कुतूहलाने नीट बघून घेतला. दुसर्या दिवसापासून तिकडे नजर वळेनाशी झाली, कारण तिथे इतकी घाण आहे आणि त्या घाणीतच माणसांची घरं आहेत, अशीच आच्छादलेली, तुटक्या दारांची, खिडक्या असलेली- नसलेली. आपल्या एसी गाडीतून फिरताना नजर बंद करता येऊ शकते, पण वासाचं काय? एअर-फ्रेशनर किती मारणार? आणि त्याला मागे सारून नाकात घुसणारी घाण कशी टाळणार?