चैत्र ते फाल्गुन किंवा जान ते डिसेंबर,वैतागवाणे काम म्हणजे,गॅलरीत साठलेला कचरा साफ करणे.चैत्रात गुढ्या,नवनवर्षं शुभेच्छा,मग काय रामनवमी,मग हनुमान जन्म,असे सगळे देव देवता सण वार,मैत्री,प्रेम,भांडणे,व्हालेन्टाईन्स,झाडे ,प्राणी,पक्षी,अवघे चराचर गॅलरीत येऊन पडते.
मग काय,ती सकाळच्या कामात आणखीन एक काम वाढवते.अन्यथा आपलाच फोन ऐनवक्ताला दगा देतो.अति झालं आणि रडू आलं असं हल्ली होऊन गेलय.पावसाळा आला की लगेच कवितांच्या चारोळ्या येऊन सांडतात. सगळी कडे मग हिरवे अंकुर त्याचे काँग्रेस गवत आणि असंख्य ग्रुप्स व व्यक्तींकडून तेच तेच मेसेजेस येऊन गॅलरी म्हणजे तणमाजुरी होऊन जाते.