इंग्रजी पोस्टकरता सॉरी! हा रिव्ह्यु मी गुडरीड्सवर लिहिला होता. तो इथे अनुवाद करून टाकावा असे वाटत होते पण मला काही ते जमेना. कोणाला अनुवाद करायचा असल्यास जरूर करा प्लीज.
मुळा मुळातच फार आवडत नसल्यामुळे फार आवडीने कधी आणला नाही. इथे मिळणारा पांढरा मुळा खूप उग्र नसल्यामुळे त्याचे निदान पराठे, मुठीया असे प्रकार करून अधून मधून खाल्ला जायचा. लाल मुळा असाच एकदा ट्राय करून बघू म्हणून आणला, पण कधीतरी चव बदल म्हणून किंवा सलाड मध्ये छान रंगसंगती दिसावी म्हणून तेवढ्या पुरताच. एक मैत्रीण आली होती तेव्हा तिने लाल मुळ्याची भाजी केली, ती आवडली म्हणून आता आवर्जून लाल मुळा आणून भाजी केली.
साहित्य -
लाल मुळ्याची एक जुडी पाल्या सकट
एक कांदा
एक लसूण पाकळी (लहान असेल तर दोन)
अर्धी वाटी डाळीचं पीठ / बेसन
या मार्च महिन्यात ताडोबाला जायचा बेत आहे. तर ताडोबाला कुठल्या गेट ने सफारी घेणे सोपे पडेल. चांगले रिसाॅर्ट.. ईतर काही अॅक्टिव्हिटी जसे जंगल ट्रेल अस काही असेल तर त्याची पण माहिती द्या. सध्या जाणारे लोक म्हणजे मी अन मुलगी .. नवरा त्याला सुट्टी मिळत असेल तर येईल.
काही महिन्यांपूर्वी साधना मासिकात शरद बाविस्कर या माणसाची ओळख, काम यांच्याविषयी वाचलं. त्यांचं पुस्तक आलय असंही वाचलं. वाचायला हवं अशी नोंद घेतली मनाने. आणि लकीली नवऱ्याने हे पुस्तक मागवलं. परवा ट्रेनमधे पुस्तक हातात घ्यायला सवड मिळाली आणि पुस्तक पूर्ण करूनच थांबले.
मला लिहायला काही चांगलं येत नाही, पण या पुस्तकाच्या विषयी लिहिल्याशिवाय रहावेना.
पंचवीस डिसेंबरची सुट्टी यापलीकडे लहानपणी कधीच नाताळशी फार संबंध आला नाही. जपानला गेले तेव्हा विमानतळावर अगदी सिनेमात पाहिल्यासारखं सजलेलं ते ख्रिसमस ट्री प्रत्यक्ष बघून एक फोटो काढला होता. जर्मनीत आल्यापासून तर ख्रिसमस आणि त्याआधीपासूनची दिसणारी तयारी सगळं जवळून अनुभवलं, त्यातही खास जर्मन लोकांच्या परंपरा समजत गेल्या. गणपती, दिवाळीसोबतच ख्रिसमसच्या पण दर वर्षीच्या आठवणी आता जमा झाल्या.
घरी दूध खूप शिल्लक होतं म्हणून पनीर करून काहीतरी करायचं ठरवलं. घरी पनीर पहिल्यांदाच करत होते. मग कुणाल कपूरची रेसिपी बघून दोन लिटर उकळत्या दुधात मीठ घातलं, एका लिंबाचा रस घातला पण हाय रब्बा दूध फुटतच नव्हतं. पुन्हा एक लिंबू पिळून ढवळा मारून दहा मिनिटं रामभरोसे उकळत ठेऊन पुस्तक वाचत बसले. थोड्या वेळाने पनीर झालं एकदाचं. मग ते कापडात बांधून, थंड पाण्यात घालून, पिळून फ्रीजमध्ये ठेवलं आणि पुढचा कार्यक्रम सुरू केला.
तसे पहायला गेले तर हे दोघे अखंड सोबत
दोघेही मनस्वी, किन्बहुना चन्चल आहेत
पण जमलेलं आहे त्यांचं गणित
एक तो, अथांग ओलावा घेऊन जगणारा
कधी उधाणून, आनंदाच्या गर्जना करत फेसाळणारा
तर कधी निशब्द हलक्या तरंगानी माया दाखवणारा
आणि एक धगधगता, धुमसता
कधी तापवून अक्षरशः गुदमरवून टाकणारा
तर कधी थापटण्याहून हलकी वाटावी अशी ऊब देणारा दुसरा
त्यांचं ते समजून घेतात एकमेकांना, उमजून चालतात अहोरात्र
मध्ये रात्रीपुरता विरह, जो नित्यनियमाने येणारा
ही ताटातूट केवळ तात्पुरती, काही काळापुरती आणि निश्चितपणे संपणारी आहे हे दोघे जाणून असतात.
थँक्सगिव्हिंग संपला आणि डिसेंबर आला की ख्रिसमस डेकोरेशन, व्हेकेशन, हॉलिडे प्लॅनिंग, काही नाही तर नुसतं सुस्त होऊन थंडीचा आस्वाद घेणे याबद्दल माझे डेड्रिमिंग सुरू होते. थंडी स्पेशल खाऊ तर आठवतोच(माझ्यासाठी क्रॉसाँ+देसी पॅटी) पण हॉलिडे स्पेशल मुव्हीज व पुस्तकंही आठवायला लागतात. हा धागा मुव्हीसाठी. मला वाटतं पुस्तकांचा पण काढावा! :)
तर- ख्रिसमस, थंडी म्हटलं की मला पुढील मुव्हीज आठवतातच! आणि मी ते दरवर्षी न चुकता पाहते. होम अलोन, जिंगल ऑल द वे, लव्ह अॅक्चुअली, ख्रिसमस विथ द क्रँक्स, लास्ट हॉलिडे आणि हल्ली हल्लीच मैत्रीणवर कळलेला पण या यादीत आलाय- द हॉलिडे.
टॉप गनः विमाने, टॉम कृझ, बाइक्स, लेदर जॅकेट्स, डेंजर झोन, कॉल साइन चार्ली, वॉच द बर्डी, गुड नेस ग्रेशस ग्रेट बॉल्स ऑफ फायर!!!
१९८६ मध्ये चित्रपट आला तेव्हा लगेचच लोकप्रियतेच्या शिखरावर विराजमान झाला. एक प्रकारे अमेरिकन नौदलाची, नौदलातील वैमानिकांच्या नोकरीची जाहिरातच म्हणत असत. आजही ह्या चित्रपटाला एक कल्ट फॉलोइन्ग आहे. भारतातही फॅन्स आहेत.
ही देवी-स्तवन रागमाला मला गेल्या नवरात्रीत कोणीतरी पाठवली आणि पहिल्यांदाच ऐकून मी अगदी मंत्रमुग्ध होऊन गेले. त्यानंतर असंख्य वेळा मी या गाण्याची पारायणं केली आहेत. आणि प्रत्येक वेळी पवित्र अशी अनुभूती मनावर गारूड करते. मन शांत करून टाकणारा दैवी अनुभव मला जाणवत जातो.
रिटायर होताना तुमच्याकडे एखादा छंद असेल तर मिळालेला मोकळा वेळ अगदी आनंदात जातो म्हणतात.
आणि ते किती खरंच आहे हे माझ्या आईकडे उमा महादेव मठकर हिच्याकडे बघितल्यावर लक्षात येईल.
मस्त भरपेट पुरणपोळी मसालेभात खाऊन आता छान ताणून देऊ..
आज शनिवार आहे, दुपारची झोप हवी म्हणजे हवीच...
आज सुट्टी आहे, दुपारी झोप काढणार आहे मी मस्त...
वामकुक्षी घेतो फक्त, अर्धा तास, जास्त नाहीच पण झोप हवी..
प्रवास झाला आहे रात्रभर, आता दुपारी भरून काढेन झोप...
अशी अनेक वाक्य तुम्ही ऐकली, खरंतर स्वतःच अनुभवली असतील. कारण majority लोकांना दुपारची झोप आवडते. आणि याच्या अगदी उलट म्हणजे दुपारच्या झोपेची फार सूत जुळत नाही अश्या मायनॉरिटी गटात मी असते.
जर्मनीतल्या ख्रिसमस मार्केट्स मध्ये मिळणारा चटपटीत असा हा खाद्यप्रकार. खरंतर गावागावात वर्षभर असे अनेक मार्केट्स लागतातच, वसंत ऋतूची सुरुवात म्हणून, उन्हाळ्यात तर अगदी रेलचेल असते, पुन्हा ऑक्टोबर मध्ये पानगळीच्या दरम्यान आणि मग शेवटी ख्रिसमस मार्केट्स. इतर वेळी बहुतांशी फक्त विकेंडला, सुट्टी दरम्यान ही मार्केट्स असतात. पण ख्रिसमस मार्केट्स नोव्हेंबरच्या शेवटी चालू होतात आणि २२-२३ डिसेंबर पर्यंत असतात. स्थानिक तर असतातच, अनेक पर्यटक सुद्धा खास ख्रिसमस मार्केट्स बघायला येतात. या मार्केट्स मध्ये हमखास एक स्टॉल तरी या मशरुम्सचा असतोच. एका भल्या मोठ्या पॅन मध्ये हे मशरुम्स शिजत असतात.
बाहेर खाण्याच्या बाबतीत अनिवासी भारतीयांमध्ये दोन प्रकारचे लोक दिसतात, एक ज्यांना इथेही बाहेर रेस्टॉरंट मध्ये भारतीय जेवण आवडतं आणि दुसरे ज्यांना ते आवडत नाही. जे इथे बाहेर भारतीय नको असे म्हणणारे असतात, त्यांची कारणं वेगवेगळी असू शकतात. कुणी म्हणतात की घरी ते खातोच, पुन्हा बाहेर काय तेच? कुणी म्हणतात की इथे भारतीय म्हणजे फक्त पंजाबी, त्याच चवी सगळीकडे त्यापेक्षा ते नको, किंवा अजून काही आपापली कारणं असू शकतात. तर काहींना भारतीय पदार्थ आवडतात म्हणून, घरी स्वयंपाकाचा कंटाळा आला म्हणून तिथे जायला आवडतं.
२०१५- २०१६ हे वर्ष ज्ञान प्रबोधिनी संस्थेचे संस्थापक आदरणीय वि. वि. पेंडसे (आप्पा पेंडसे) यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. आप्पांनी सुरु केलेल्या ज्ञान प्रबोधिनी प्रशालेची मी माजी विद्यार्थिनी. ह्या विशेष स्मृती वर्षात आपल्याला काय करता येईल असा विचार करताना प्रशालेतील पाचवी ते दहावी मधल्या वर्षांच्या आठवणी लिहून काढाव्यात अशी कल्पना मनात आली. दरम्यान मायबोलीवर शाळेच्या आठवणींचा एक धागा सुरु झाला आणि आठवणी लिहून काढायला निमित्त मिळाले! तिथे लिहिलेल्या आठवणी एकत्रित स्वरुपात राहाव्यात म्हणून इथे प्रसिद्ध करत आहे.
फार म्हणजेच फारच उशीराने, मे-जून मध्ये केलेल्या भारताच्या ट्रिप बद्दल आता पाच महिने होऊन गेल्यावर अखेरीस त्याबद्दल पोस्ट करायला सुरुवात करते आहे.
ही बरीचशी दैनंदिनी आहे, थोडं प्रवास वर्णन आहे, भारतातल्या तीन चार आठवड्यांच्या वास्तव्यात दिसणारे, जाणवणारे बदल, येणारे अनुभव, त्याबद्दलचे जरा विचार असं सगळंच आहे. अनेक वर्ष भारता बाहेर राहून प्रत्येक भारतवारी वेळी अनेक बदल दिसतात, कळत नकळत दोन्हीकडची तुलना पण होत असते. काही व्यक्तिगत बाबी तर काही माझ्यासारख्या अनेकांना अश्या वेळी जाणवत असतील अश्या गोष्टी.
आलीच की दहावी! प्रबोधिनीतली सहा वर्षे चढत्या भाजणीची वाटतात मला. त्यामुळे दहावीचं वर्ष सगळ्यात खास आणि खूप लक्षात राहिलेलं आहे. नववी आणि दहावी आम्ही एकाच वर्गात (वर्गखोली) होतो. त्यामुळे कदाचित नववी ते दहावी हे transition देखील जाणवलं नाही. आमच्या पंचनदीच्या शिबिराची एक गम्मत म्हणजे हे शिबीर झालं २६ मार्च ते ३० मार्च ह्या कालावधीत आणि आमच्या वार्षिक परीक्षा होत्या एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात! म्हणजे नववीच्या वार्षिक परीक्षेच्या एक आठवडा आधी आम्ही सगळा अभ्यास सोडून कोकणात शिबिराला गेलो होतो. आमच्या सुदैवाने पालकांना आणि शाळेला ह्यात आमचे “शैक्षणिक नुकसान” होण्याची भीती वाटली नाही.
नववीच्या खूप आठवणी आहेत पण एक आठवण आहे जी सगळ्या आठवणींपेक्षा सर्वात जास्ती ठळक आणि लाडकी आहे आम्हा सगळ्यांचीच! म्हणून मी ती सगळ्यात शेवटी सांगणार आहे!
आठवीत चारुता ताई आमच्या वर्ग शिक्षिका होत्या. त्यांच्याबरोबर आम्ही वर्षभर एक वेगळा उपक्रम राबवला! महिन्यातले एकाआड एक शनिवार वर्गातल्या चौघी जणी दुपारची शाळा सुटल्यावर ताईंबरोबर त्यांच्या घरी जायचो. तिथे अख्खी दुपार घालवायची आणि मग संध्याकाळी घरी परत जायचं! ह्या दुपारच्या वेळात आम्ही काहीतरी कलाकारी करायचो आणि शिवाय एखादी कमी कटकटीची पाककृती बनवायचो. ह्याशिवाय ताईंशी आणि त्यांच्या घरच्यांशी अखंड गप्पा असायच्याच! अशाप्रकारे आम्ही सगळ्या जणी त्या एका वर्षात ताईंच्या घरी जाऊन आलो. हा खरंच खूप छान उपक्रम होता. आता वाटतं की ताईंनी केवढी मोठी commitment केली होती आमच्यासाठी!
२०१५- २०१६ हे वर्ष ज्ञान प्रबोधिनी संस्थेचे संस्थापक आदरणीय वि. वि. पेंडसे (आप्पा पेंडसे) यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. आप्पांनी सुरु केलेल्या ज्ञान प्रबोधिनी प्रशालेची मी माजी विद्यार्थिनी. ह्या विशेष स्मृती वर्षात आपल्याला काय करता येईल असा विचार करताना प्रशालेतील पाचवी ते दहावी मधल्या वर्षांच्या आठवणी लिहून काढाव्यात अशी कल्पना मनात आली. दरम्यान मायबोलीवर शाळेच्या आठवणींचा एक धागा सुरु झाला आणि आठवणी लिहून काढायला निमित्त मिळाले! तिथे लिहिलेल्या आठवणी एकत्रित स्वरुपात राहाव्यात म्हणून इथे प्रसिद्ध करत आहे.
इकडून जाताना कुणासाठी काय न्यायचं याची एक यादी असते. एक यादी असते भारतात आईला करायला सांगायचे पदार्थ, बँकेची किंवा काही कागदपत्रांची कामं असतील तर ती एक यादी, एक शॉपिंगची यादी, ज्यात इकडे येताना आणायचं सामान, कपडे, भांडी असं काय काय असतं. मग गेल्यावर याद्या एकेक करत टिक मार्क होत जातात.
एक तारीख आली की लगेच आई बाबा सगळ्या कामवाल्या बायकांचे पैसे काढून ठेवतात, कुणालाही पगारासाठी वाट बघावी लागू नये, वेळच्या वेळी दिलेच गेले पाहिजेत ही शिस्त. मी आले म्हणून एक कामवाली खास दोन वेळा येते, त्याचे जास्तीचे पैसे पण देतात. या सगळ्या जणी आमच्या कुटुंबाचाच भाग आहेत. पोळ्यावाली रीता म्हणजे आईची मानसकन्याच. एक दिवस तिनी आम्हाला आग्रहाने जेवायला बोलावलं होतं. मी सृजन आणि आई गेलो. तिनी अत्यंत चविष्ट अश्या कचोर्या, चाट आणि शिवाय सृजनला आवडतात म्हणून रंगीत पापड कुरड्या असा बेत केला होता. आग्रह करून ती वाढत होती. सृजनला तिच्या घराच्या गच्चीत फार आवडलं. म्हणून तो मला घेऊन गेला.
कधी जायचं भारतात यासाठी सृजन रोज Countdown करत होता, त्यालाही खूप दिवसांनी विमानात बसायला मिळणार होतं. आईची जय्यत तयारी चालू होती. तुम्ही आले की हे करायचं, ते करायचं याच्या याद्या वाढत होत्या. त्या आधीपासून बाबा म्हणत होते की घराला रंग देऊ, आई म्हणत होती आता कशाला? नको एवढ्यात. पण मग मी येणार हे ठरल्यावर बाबा जिंकले आणि रंगाचे काम झाले, त्यामुळे घर पण सगळं सजून धजून होतं. मधल्या काळात घरात नवीन सोफा आला, गार्डन मधल्या फरश्या बदलल्या, नवीन पडदे लागले असे बरेच बदल होते. घरातलं आंब्याचा झाड वाढलं आहे, त्याला कैऱ्या आल्यात त्या बघायच्या होत्या. शक्य त्या सगळ्यांना भेटायचं होतं.
फार म्हणजेच फारच उशीराने, मे-जून मध्ये केलेल्या भारताच्या ट्रिप बद्दल आता पाच महिने होऊन गेल्यावर अखेरीस त्याबद्दल पोस्ट करायला सुरुवात करते आहे.
ही बरीचशी दैनंदिनी आहे, थोडं प्रवास वर्णन आहे, भारतातल्या तीन चार आठवड्यांच्या वास्तव्यात दिसणारे, जाणवणारे बदल, येणारे अनुभव, त्याबद्दलचे जरा विचार असं सगळंच आहे. अनेक वर्ष भारता बाहेर राहून प्रत्येक भारतवारी वेळी अनेक बदल दिसतात, कळत नकळत दोन्हीकडची तुलना पण होत असते. काही व्यक्तिगत बाबी तर काही माझ्यासारख्या अनेकांना अश्या वेळी जाणवत असतील अश्या गोष्टी.
रक्ताची चटक लागलेले
चाकू सुरे खुले आम हिंडत आहेत...
रक्ताची चटक लागलेले
चाकू सुरे खुले आम हिंडत आहेत.
तरुण मुलींचे मन, कातडी, मांस, रक्त
पाहून लालचावत आहेत.
रुपाली..श्रद्धा.. आणि
उजेडात न आलेली सावजं किती तरी
आईवडिलांशी भांडून घर सोडलेल्या, पळून गेलेल्या किती तरी
इतक्या भाळल्या? कशाला भुलल्या?
जिवावर अशा कशा उदार झाल्या?
रक्ताची चटक लागलेले
चाकू सुरे खुले आम हिंडत आहेत.
तरुण मुलींचे मन, कातडी, मांस, रक्त
पाहून लालचावत आहेत.