नऊ - दहा वर्षांपूर्वीची गोष्ट. आमच्या कंपनीत आमचा एक ट्रेक करणारा ग्रुप होता. पुण्याच्या आसपास छोटे मोठे ट्रेक करायचो. कधी सकाळी जाऊन संध्याकाळी परत तर कधी मुक्कामी. फार भारी वाटायचं. कुठंही ट्रेकला जाताना नवीन कोणी सोबत येत असेल तर त्याला काय काय सोबत घ्यायचं , काय करायचं , कसं वागायचं याच्या असंख्य सुचना आम्ही द्यायचो. ट्रेकिंग म्हणजे 'अपने बायें हात का खेल'' असं झालं होतं. अशातचं एका मित्राने बातमी आणली कि नाशिक जवळ कुठेतरी दहा पंधरा दिवसांनी एक ट्रेकिंगची स्पर्धा होणार आहे. स्त्री, पुरुष आणि मिश्र अश्या तीन गटांत स्पर्धा होणार होत्या. मग काय आमची ग्रुप जुळवा जुळवीची तयारी सुरु झाली.
माझी सध्याची मदतनीस पूर्वी इस्राईल मधे होती. मागच्या आठवड्यात तिच्याशी गप्पा मारताना पिटा, फलाफल, हमस वगैरे विषय निघाले. तिला पण खूप आठवण येत होती खाण्याची, आणि युरप प्रमाणे तोक्यो मधे हे पदार्थ सगळीकडे मिळत पण नाहीत चांगले. मी घरी करते म्हणल्यावर मला म्हणली करूयात का आपण, मी पण मदत करते. मग लगेचच घाट घातला. सगळ्या कृत्या आंतरजालावरच्या मिक्स आहेत. कुणाचे हे तर कुणाचे चे असे करून माझी ट्राईड आणि टेस्टेड कृती बनली आहे.
पिटा
चांगला ताजा पिटा ब्रेड मिळत असेल जवळपास तर अजिबात हे करू नका. हे आम्हाला मिळत नाहीत म्हणून केलेले/करावे लागणारे उद्योग आहेत.
साहित्य:
सरिते किती धावतेस गातगात
विचारले दोन्ही तीरांनी तिज सावरत
तारू चालले एक संथ गतीत , सांगत
ने मज मम गावी
ने मज मम गावी
अवखळ, तरी अलगद नेले आपुल्या गावी
नुकतेच उजाडले सोनपावली
रान मोकळे,पाखरं सुगम संगीत गात झेपावली
धावली गोवत्से , पिलांस मायसावली
मधुसेवना भृंग डोलती
राग येत नाही फूलां, उलट भावती
ठेका धरुनी साथ देती
प्रथम नक्षत्रांचे देणं
अंजुलीचे भरणं
विजयानंद हे मग जीवन गाणं
विजया केळकर______
हा वीकांत कविता वाचत घालवला. (शुम्पीच्या इरामुळे स्फूर्ती मिळाल्यामुळे :fadfad: ) शोधाशोध करताना जपानी कवयित्री सगावा चिका हिच्या abstract, modernist (btw ह्या कविता १९२०-३० च्या काळातील आहेत) कविता खूप आवडल्या. ही उमदी कवयित्री वयाच्या अवघ्या पंचविशीत कॅन्सरमुळे मृत्युमुखी पडली. अवघ्या पाच सहा वर्षात लिहिलेल्या तिच्या कविता आहेत. एक- दोन कवितांचा अनुवाद करण्याचा मोह आवरला नाही. त्या कविता इथे देतेय.
काचपंख
माणसं हळूच प्रेम पाठवतात
काचेच्या पंखांमध्ये अलगद ठेवून
चौकातच सूर्य त्यांचा करून टाकतो चुरा.
खिडकीसमोर आभाळ उभं ठाकतं
काळवंडू लागतं खोटा श्वास थांबताना.
तांदूळ दोन वाट्या, गूळ दोन वाट्या, नारळाचे दूध दोन वाट्या, ओलं खोबरं एक वाटी, तूप चार चमचे, 7/8 लवंग, वेलची पावडर, बदाम, बेदाणे, मीठ, केशर किंवा केशरी रंग
फूड चॅनलवरची ही रेसिपी मला माझ्या कलिगने दाखवली. मूळ रेसिपी मला खूप इंटरेस्टिंग वाटली नाही कारण ड्राय होती म्हणून मी आमच्या आवडीप्रमाणे मॉडिफाय केली.
जिन्नस- ४ पाईंट चेरी टोमॅटोज,
१/२ कप ऑलिव ऑईल,
लसणीच्या पाकळ्या - ४ ,५ मोठ्या- स्लाईस करुन किंवा बारीक चिरून,
हर्ब्ज- थाईम, पार्सले- ह्यांचा एक छोटा बॉक्स येतो ग्रोसरी स्टोअरला. त्यातले पूर्ण वापरायचे.
बेसिलची पानं- - भरपूर् /हवी तितकी. माझ्याकडे दोन कुंड्यांमध्ये लावलेलं आहे त्यामुळे मुबलक वापरता येतात.
मीठ आणि फ्रेश मिरपूड. लाल मिरच्यांचे फ्लेक्स.
पार्मेजान चीज- मूळ रेसिपीत भरपूर आहे पण मी तेवढं वापरलेलं नाही.
सध्या लो कार्ब काही मिळतय का असा शोध चालु असल्याने नवनवीन रेसिपी शोधत असते.. त्यात ही रेसिपी सापडली आ्णि आवडली.. आंतरजालावर ब-याच वेगवेगळ्या रेसिपीज आहेत.. त्यात माझ्या प्रमाणे काही बदल करुन ही केलेली रेसिपी
साहित्य
५ ६ अंडी
१ कांदा
४ ५ लसूण पाकळ्या
२ ढबु मिरच्या
५ ६ टोमॅटो
टोमॅटो सॉस १ २ चमचे
चिली फ्लेक्स १ चमचा
तिखट १ चमचा
मिक्स्ड हर्ब्स
ओरेगानो
चीज
मीठ
तेल
कृती
ही पाककृती पॅनमध्येच करावी.. कढईमध्ये होणार नाही..
कांदा, लसुण, ढबु मिरची, टोमॅटो नॉर्मल चिरुन घ्यावी. थोडं बारिकच चिरावं
या महिन्याचा साहित्य कट्ट्याचा विषय सगळ्यात अवघड विषय आहे...निदान माझ्या साठी तरी!
जेव्हा पहिल्यांदा ऐकलं की 'यावेळी स्वतः बद्दल लिहायचं आहे' तेव्हा वाटलं, " माझ्याबद्दल लिहायचं म्हणजे तर किती काही लिहिता येईल. कारण माझ्या इतकं मला कोणीच ओळखत नाही." पण जेव्हा त्या दृष्टीनी विचार करायला सुरुवात केली तेव्हा लक्षात आलं की हे प्रकरण वाटतं तेवढं सोपं नाहीये..
माझ्यातलं 'मी'पण शोधताना मला बरंच काही सापडतंय. माझ्या आत्तापर्यंतच्या पन्नास वर्षांत मी कशी घडत आणि काही वेळा बिघडत गेले याचा अभ्यास करताना किती तरी interesting गोष्टी लक्षात आल्या.
अळूची चिंचगुळातली मसाला देठी
तसा मला रेसिपी द्यायला उशीर झालाय, श्रावणात शाकाहार असल्याने अनेकांना भाज्या काय करायच्या हा प्रश्न पडतो. त्यासाठी ही वेगळी कृती!
साहित्यः
अळूची नुसती देठी २५/३० नग, चिंचेचा कोळ तीन चमचे, गूळ तीन चमचे, लाल तिखट एक चमचा, गोडा मसाला दोन चमचे, शेंगदाण्याचे कूट अर्धी वाटी, ओले खोबरे अर्धी वाटी, मीठ चवीनुसार, तेल फोडणीसाठी,फोडणीचे साहित्य, कोथिंबीर.
कृती:
मी सध्या रोज दोन वेळाच जेवते. (ईंटरमिटंट + जगन्नाथ दिक्षित) तसेच जेवणात कडधान्यं रोज घेते. बाकी कशात साखर नाही, गुळ नाही, तेल नाही. (जेमतेम अर्ध्या चमचा तुपात करते स्वयपाक+ पोळ्यांचे तुप), शिवाय भरपूर सॅलड. असे जेवण होत असल्याने कडधान्य/ रस्सा भाजी जरा चमचमीत करते, म्हणजे छान वाटते जेवायला. मी सध्या ह्या एकाच ग्रेव्हीत राजमा, छोले, ब्लॅक बीन्स, ब्लॅक आईड पीज, मसूर इत्यादी केले आहेत. सगळे अफाट सुंदर झाले चवीला. रोज एकच ग्रेव्ही खाऊन कंटाळा येत नाहीये, खरंतर सेम ग्रेव्ही खातीय असे वाटत पण नाही. पण म्हटले नवे प्रकार बघूया.
दिवाळी, गणपती, आम्ही भारतात सुट्टीसाठी जातो तेंव्हा आमच्या स्वागतासाठी , नाती पहिल्यांदा घरी आल्या त्यावेळी , सुनेचं डोहाळजेवण ह्या आणि अशा अनेक वेळी घरी काही छोटं-मोठं कार्य असेल तेंव्हा अतिशय उत्साहाने बाबा दारात रांगोळी काढतात.
ज्या दिवशी रांगोळी काढायची असेल त्या दिवशी पहाटे उठून मार्केट यार्ड मध्ये त्यांच्या आवडीची फुलं आणायला जातात. आणि मग सगळी फुलं, पानं घेऊन दारात ५-६ तास बसून रांगोळी काढतात.
अभेद्य अथांग तटबंदी असलेली घरे माणसे आणि समाज कालौघात कशी एकाकी जलदुर्गासारखी होतात,इतिहासाची साक्ष म्हणून फक्त भेटीसाठी ठरविक माणसे येऊन फार फारतर काही क्षण विस्मय,आश्चर्य,आदर व संवाद घडत असतीलही पण दुतर्फा काही मनमोकळं संवादात्मक घडतच नाही,तटबंदी मूळे बाहेरच्या जगाशी काही सम्बन्धच नसल्याने एकतर्फी इतिहासाची उजळणी व पराक्रमाच्या गाथा संगीतल्या जातात,बाहेरच्या जगातले बदलते तंत्रज्ञान,जाणिवा,जगण्यातले संघर्ष,गतिमानता,प्रवास,ताण यांची कशाचीच नोंद मन घेण्यास तयारच नसल्याने,मग फक्त जुजबी विचारपूस व कोरडे बोलणे होते.
झोपेतून जागी होत असताना अजून तिचे डोळेही उघडले नव्हते , पण खिडकीवर टपटप आवाज ऐकला आणि उबदार पांघरुणातून उठलीच ती . तो आला होता , भेटायला , किती दिवसांनी . तिचा पाऊस ! आणि तिला त्याने साद घातली होती , त्याच्या पद्धतीनी . तिला सगळ्या त्याच्या पद्धती माहित होत्या . टपटप , रिपरिप टपक-टापक, धो-धो , टाप -टप् , तिचा लाडकाच ना तो. मग खिडकीत त्यांची गाठभेट आणि त्याच्या अजूनच उनाडक्या , अजूनच टापुर -टुपूर , ‘वेडा कुठला’ म्हणाली ती , पण तिथेच उभी राहिली . तोही जरा मग शहाणपणाची चादर पांघरलेल्या यड्यासारखा , तिला दाखवण्यासाठी म्हणून जरासा शांत झाला.
मैत्रिणीने राखीची ऑर्डर दिली, कधी केल्या नव्हत्या त्यामुळे धाकधूक होती मनात. करायला घेतल्या आणि प्रेमातच पडत गेले :dhakdhak: 2-4 तरी कर असं सांगितलेलं तरी बघता बघता 12 केल्या मी मजा आली. सिम्पल पण एलिगंट राख्या सगळ्याना आवडतील अशी आशा :)
“हो ते तसं होणं स्वाभाविक आहे... पूर्ण आयुष्य आपण नाकाने श्वास घेण्यासाठी ट्रेन झालो आहोत. अचानक तुला कोणी सांगितलं तोंडाने श्वास घे आणि तेही पाण्याखाली तर थोडा त्रास होणारच!
हे बघ, स्कुबा डायविंग सर्वांसाठी नसतं...पण मी म्हणेन ते प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी करून बघावं...
आपण अजून १-२ दा ट्राय करू. नाही जमलं
तर you can always say no!”
माझा स्कुबा डायविंग ट्रेनिंग इंस्ट्रक्टर ऍशली मला सांगत होता. आम्ही जवळजवळ ५ फूट पाण्यात उभे होतो. आणि मला स्कुबा डायविंग च्या air regulator ने श्वास घ्यायला तो शिकवत होता.
“इन्सान को अपनी हर एक सांस का एहसास होता है. Like we are fully alive!”
मी व आपली इथलीच मैत्रिण स्नेहश्री आम्ही मिळुन काही फुड प्रोडक्टचा बिजनेस करु असे ठरवले. अनायसे, मी गव्हाचे सत्व करत होते तेव्हा त्यासाठी त्याचे "न्युट्रिशनल" हे ब्रँड नेम व फेसबुक पेज तयार केले होते. तर त्याच नावाने व त्याच पेजवरुन पुढे काही करु असे ठरले. सध्या आम्ही "रक्षा बंधनानिमित्त गिफ्ट हँपर" लाँच केले आहे.
"टॉयलेट मध्ये गेलो, बघतो तर काय, कमोड शॉवर च्या नळावर सरडा!! थोडक्यात वाचलो."
या वाक्याला अपेक्षित 'हो का, अरे बापरे' न येता समोरचं नाक मुरडून समोरच्या कपाळावर आठी पडली.
"भलत्या शंका घेऊ नका.कमोड वर बसण्या आधीच दिसला सरडा, बाहेर आलो आणि दुसऱ्या खोलीच्या टॉयलेट मध्ये काम केले."
कपाळाच्या आठ्या विरून अपेक्षित 'अरे बापरे' आले.
"हे तर काहीच नै, त्या चीन का थायलंड मध्ये एकाच्या टॉयलेट मध्ये अजगर होता. चावला ना भलत्या जागी.टाके पडले."
सरड्या पासून बचावलेल्या वीराने मनात 'हिचं ऍनिमल प्लॅनेट बघणं कमी केलं पाहिजे.भलत्या वेळी भलत्या दचकवणार्या बातम्या बघत असते" अशी खूणगाठ बांधली.
प्रस्तावना
टिमवित असताना आमच्या विद्यार्थ्यांसाठी एक उपक्रम राबवण्यासाठी मी एक कल्पना मांडली होती. डिस्टन्स मोड शिक्षण असल्याने आमचे विद्यार्थी अगदी खेड्यापाड्यात पसरले होते. त्यामुळे त्या त्या गावांचा इतिहास लिहिला जाईल म्हणून "माझे गाव" ही कल्पना मी मांडली. काही कारणांनी ती तिथे प्रत्यक्षात आली नाही. पण ही कल्पना मनात ठाम रुजून राहिली.