मला कुंभारकाम करायला लागून जवळपास तीन वर्षे होत आली, पण अजूनही ते सगळे कालच सुरु केले आहे अशा तर्हेने झटापट चालू असते. घरात जिकडे तिकडे विचित्र आकारांची आणि रंगांची भांडी पडलेली असतात. चार लोक पोहे खायला आले तर चौघांना वेगवेगळ्या प्रकारच्या, रंगाच्या, आकाराच्या, ताटल्या अन् भांडी मिळतात. माझे बिचारे देवही त्यातून सुटले नाहीत. उदबत्तीचे घर, दिव्याखालची ताटली हे सगळे - अपना हाथ जगन्नाथ ह्या प्रकारात मोडणारे!
ठरवल्याप्रमाणे दूसर्या दिवशी हॉटेल मध्ये Breakfast करुन Singapore zoo बघायला गेलो. हा झू सिंगापूर च्या Rainforest मध्ये २८ हेक्टर ईतका पसरलेला आहे. झू मध्ये विवीध विभाग आहेत जसे की Wild Africa, Reptile garden, Australian zone, etc. Map घेऊन तुम्ही सुरवात कुठून करायची ते ठरवु शकता. ईथे पण फिरायला ट्राम आह्ते तरी पण खुप चालायला लागते. झू चे एक वैशिष्ट्य कि सर्व प्राणी त्यांच्या नैसर्गिक वातावरणात आहेत कुठेहि पिजरे, जाळ्या नाहित.
यंदा दिवाळीत सिंगापूरला जायचे ठरवले. कोणत्याहि ट्रव्ह्ल कंपनी बरोबर न जाता आपण आपलीच ट्रीप करायची म्ह्णून मग इंटरनेट वरुन माहिती गोळा करायला सुरवात केली. बर्याचशच्या ट्रव्ह्ल कंपनींच्या itinerary चेक करुन ट्रीप plan केली.
नुकतीच पुण्याला एक धावती भेट देण्याचा योग आला. त्या भेटीत सकाळी वेताळ टेकडीवर मॉर्निंग वॉकला गेलो होतो. काय सुरेख ठिकाण आहे ते. फॉरेस्ट खात्याच्या अखत्यारीत आहे बहुतेक, पण त्यामुळे अतिशय स्वच्छ राखली गेलेय. टेकडीवर जाण्याच्या रस्त्याला एक गेट आणि त्यावर राखणदारही आहेत. पार्किंगकरता वर जागाही आहे. आणि मग आत जंगलात फिरण्यासाठी अनेक पायवाटा आहेत. तुम्हाला हवी ती निवडा आणि स्वच्छंद फिरा.
शनिवार, ५ डिसेंबर २०१५ च्या सकाळची ही क्षणचित्रं :
खूप दिवसांनी असा चित्रपट पाहिला ज्याबद्दल खूप लोकांना खूप (वेगवेगळी) मतं आहेत. ज्यांना आवडला त्यांना प्रचंड आवडलाय.. ज्यांना नाही ते शिव्या घालतायत. तुमचं काय मत आहे?
{अश्वथामा एक चिरंजिवी ! मृत्यूचे त्याला भय नव्हते. मात्र महाभारतातील एका भयंकर चुकीमुळे, त्याच्या कपाळावरचा जन्मजात दिव्य मणी उपसून काढला गेला. अन तिथे राहिली एक न सुकणारी जखम ! ही डोक्यावरची भळभळणारी जखम घेऊन हा चिरंजिवी अजूनही फिरतो आहे.
आपला समाज एक सनातन समाज - ज्याला आदि नाही, ज्याला अंत नाही ! एका अर्थाने चिरंजिवी ! आपल्याही कपाळावर एक दिव्य मणी आहे, संयमाचा !
मला काही भारी चित्र काढता येत नाही. पण मला चित्रं काढायला मात्र भारी आवडते!! :heehee:
आईने व्हॉट्सॅपवर ही स्केचेस पाठवली अन विस्मरणात गेलेल्या कितीतरी गोष्टी आठवल्या! मी सदोदित कुठल्यातरी पुस्तकातून पाहून चित्रे काढायचे. मजा होती एकदम!! ही सगळी १२ एक वर्षं जुनी आहेत. माझी चित्रकला आता ह्याहीपेक्षा खराब झाली आहे. :) एनीवे- हसू नका बरे!
(शेवटचे सगळ्यात भारी मी नाही काढलेले. माझी चित्रकार मैत्रीण मला शिकवत होती)
मला आठवणारे पहिले नाटक कुठले असेल तर ते" कट्यार काळजात घुसली" हेच असेल.
आम्ही पेणला रहात होतो तेव्हा आमच्या शाळेच्या ओपन एअर नाट्यगृहात नाटक बघणे हा एक सोहळाच असे. शहरापासून काहीशी दूर, एरवी दिवसाच्या उजेडात दिसणारी शाळा रात्री किती वेगळी भावत असे. रात्रीचा गारठा, सोबत रातकिड्यांची किर्र्रर्र, अंधूक दिवे, नटून ठटून आलेले लोकं, मध्ये खुर्च्या आणि बाजुला असलेली भारतीय बैठक, समोरचा मरून रंगाचा वेल्व्हेटचा पडदा, लावलेली नाट्यगीतं अन भावगीतं, ... सारं सारं वातावरण अगदी भारून टाकणारं. अन मग उघडला जाणारा पडदा अन त्या मागचे एक पूर्ण वेगळे जग. जणू प्रतिसृष्टीच अवतरायची तिथे.
प्रदर्शित झालेल्या तसेच कमिंग सून असण्याऱ्या चित्रपटांविषयी इथे चर्चा करूयात . आपलं ते हे फिल्मी गॉसिप सुद्धा करायचं बर का :heehee: :winking: :biggrin::bigsmile:
रंगपंचमीचा दिवस होता तो. सकाळीच माईने मला ओवाळले, तिलक लावला, नंदबाबांनी गुलाल लावला गालाला आणि रंगीत करून टाकला सारा दिवस. त्यांचे आशीर्वाद घेऊन बाहेर पडलो अन सगळ्या गोपांनी घेरून टाकलं. नुसती धमाल सुरू झाली.
सगळे एकमेकांना रंगवत यमुनेतीरी आलो. तर तू अन तुझ्या सख्याही तिथे आलेलात, नेहमी प्रमाणे पाणी भरायला. पण आज तुम्हाला घाई नव्हती. तू पुढे झालीस, मला हळूच गुलाल लाऊन उलटी वळलीस. पण मी असा सोडणार नव्हतोच तुला. मीही गुलाल उधळला. सगळेच गोपही रंग उडवू लागले. लाल, निळा, गुलाबी, केशरी सारे रंग एकमेकांत रंगू लागले.
अनेक जणं आयुष्यात स्वप्नं पाहतात. अनेक जणं ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्नही करतात. असंच एक स्वप्न पाहिलं, चेन्नई स्थित सुबश्री नटराजन यांनी! ते स्वप्न आहे जगातील सर्वात मोठ्या ब्लँकेटचे! आणि त्या स्वप्नाला सत्यात उतरवण्यासाठी त्यांनी अनेकजणींना सोबत घेतलं; त्यांनाही हे स्वप्न पहायला लावलं. इतकच नव्हे तर त्यासाठी सगळी तपशीलवार योजना आखली.
ऑगस्ट पासून ही सर्व तयारी सुबश्री यांनी सुरू केली. गिनिज वर्ल्ड रेकॉर्डसाठी आवश्यक तो सर्व पत्रव्यवहार त्यांनी केला, गिनिजकडे त्यासाठीचे रजिस्ट्रेशन केले आणि जगातील सर्वात मोठ्या ब्लँकेटचा विडा उचलला.
ओम जय अंबे गौरी
मैया जय शामा गौरी.
तुमको निशिदिन ध्यावत
हरि ब्रम्हा शिवजी.
सावन मधून ही आरती सिलेक्ट केली की सुरू होते एक महापूजा. मनातल्या मनातच. पहाटेच्या शांत वेळी. कामाचा धबडगा अजून सुरु व्हायचा आहे आणि कालचे घाव, मानसिक आंदोलने निद्राराणीने दूर पाठवलेली असतात. मन स्वच्छ आणि अलर्ट असते.
मानस पूजेची पहिली तयारी म्हणजे मन अतिशय साफ करणे, काम , क्रोध, मद मत्सर
आदि भाव पार काढून एखाद्या निष्पाप निरागस मुलासारखे बनणे. झोपेतून उठल्यावर
लेकराला जशी आईची आठवण पहिले येते तसे मन देवीच्या मंदिराकडे चालू लागते. काय त्या
( हा उत्तरार्ध लिहिताना माझी इतिहासकाराची कवचं काढून ठेवली आहेत; म्हणून ही कथा. या सर्व लिखाणासाठी केवळ माझी आई, मामा, मावशी यांच्या आठवणीच मदत करू शकल्या. कोणतेच लेखी पुरावे नाहीत. त्यामुळे याला मी लेख नाही म्हणु शकत. अन मग कथा लिहायची तर त्याचे काही नियम, काही सवलती मी स्विकारले, घेतल्यात. आशा आहे तुम्ही समजून घ्याल.
(नवरात्र हा स्त्री शक्तीचा उत्सव. माझ्या आजीतल्या स्त्री शक्तीची माहिती देणारे दोन लेख टाकतेय. काहींनी पूर्वी वाचले असतीलही. आज नवरात्रीच्या निमित्ताने इथे टाकतेय)
एका नातेवाईकाकडच्या लग्नात रुखबतात फक्त रुमाल नव्हते म्हणून १ दिवसात करुन दिले सगळ सामान आणण्यापासुनच तयारी होती. घाईघाई मधेच भरतकाम डिझाईन काढण्यापासून केले आहे.
ह्या महिन्यात सृजनाच्या वाटासाठी लिहायला मैत्रिणींना वेळ होत नाहीये असं दिसतं आहे. वेळ काढून लिहुयातच काहीतरी छान!
पण तोवर इथे लिहू शकतोच कि.. अगदी एका शब्दात, एका ओळीतही चालेल!
तुम्हांला कोणत्या एका गोष्टीपासून स्वातन्त्र्य हवं आहे? किंवा समाजाला, देशाला, एखाद्या विशिष्ठ भाग अथवा समुदायाला कशापासून स्वातंत्र्य मिळायला हवं अशी तुमची इच्छा आहे?
देवीचं नवरात्र म्हणजेच स्त्री-शक्तीचा सोहळा! घर-दार-कुटुंब सांभाळणारी स्त्री असू दे, काबाडकष्ट करून लेकरांचं भलं होण्याची स्वप्नं पहाणारी स्त्री असू दे, पुरुषी विश्वात आपली दमदार पावलं आत्मविश्वासानं पुढे टाकणारी स्त्री असू दे अथवा आपल्या व्यवसायाचा भला मोठा पसारा एकहाती सांभाळणारी स्त्री असू दे ..... आपण सगळ्या आहोत त्या स्त्री शक्तीचीच रुपं. त्या आदिमाता शक्तीला वंदन!!!
नवरात्री निमित्त मैत्रिणतर्फे आम्ही तुमच्याकरता विविध उपक्रम घेऊन येत आहोत.
रात्री मुलांना झोपवताना मी एक गाणं बरेचदा म्हणते - 'गोजिरवाणी खार पहा ही, गोजिरवाणी खार!' पूर्वी मुलांना आवडायचं गाणी ऐकणं...आता ती माझीच गरज म्हणून मी घसा साफ करून घेते. हिचं गाणं ऐकण्यापेक्षा पटकन झोपलेलं बरं...असा विचार करून ते लवकर झोपतात हा एक मोठा फायदा! असो!
केव्हापासून कासला जायचे असे मनात होते. शेवटी या विकेंडला अचानक जायचा प्लान केला. मुलगी बरोबर असल्याने खूप चालता आलं नाही किंवा कुमुदिनी तलावापर्यंतही जाता आलं नाही. पण जे पाहीलं ते फार सुंदर आहे. कासला जायचा रस्ताही खूप मस्त आहे.
यावर्षी पावसाच्या लहरीपणामुळे असेल किंवा काय माहित नाही फुलांचे गालीचे दिसले नाहीत. कारवी फुलली आहे असे ऐकले पण नेमके आम्ही निघालो तेव्हा ठोसेघर पर्यंत जाताना तुफान पाऊस.समोरचे काहीच दिसत नव्हते त्यामुळे डोंगर दर्यावर फुलली असेल तरी दिसली नाही.
भाद्रपद महिना म्हणजे गणेशोत्सवाचा जल्लोष! या दिवसांत बाजारपेठांतील गल्ली अन गल्ली मंगलमय रूप धारण करते. जिकडे तिकडे अत्तर, उदबत्त्यांचा सुगंध, फळांच्या गाड्यांवर फळांच्या सुबक राशी, फुलमार्केटमध्ये सजावटीची फुले, कंठ्या नी दूर्वा, सुगंधी फुलांनी मार्केट इतके मंगलमय झालेले असते की तिथून पाय पुढे निघत नाहीत. काही सजावटीची दुकाने तोरण, माळांनी घरा-घरांतील गणेशाचे स्वागत करायला सज्ज झालेली असतात. हलवायांच्या दुकानांत मोदकांच्या सुबक राशी रचल्या जातात. सीडींची दुकाने गणेश भक्तीच्या गीतांनी सुरेल झालेली असतात. गणपतीच्या आगमनापूर्वीचे दोन दिवस तर बाजारपेठ तुडुंब भरलेली असते.